समाज कल्याणचा २५ कोटीचा निधी तिर्थदर्शन योजनेचे नावाने उधळपट्टी

समाज कल्याणचा २५ कोटीचा निधी तिर्थदर्शन योजनेचे नावाने उधळपट्टी करण्यात आल्याची चौकशी करून वसुलीची कार्यवाही करणे बाबत वंचित बहुजन युवा आघाडी कडून तक्रार दाखल.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ह्या नावाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील ६५ तीर्थक्षेत्रांवर तीर्थाटन करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती.त्यात आतापर्यंत ७२२५ जणांनी लाभ घेतला आहे.योजनेवर २० कोटी खर्च करण्यात आले आहेत.पुन्हा २५ कोटी रुपयांची मागणी सामाजिक न्याय विभागाने केली सरकार कडे केली आहे.विशेष म्हणजे योजनेसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उपलब्ध नव्हते.त्यामुळे वृध्द व अपंगासाठी गृहे या राज्यस्तरीय योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लेखाशिर्ष २२३५-१४३२ मध्ये आर्थिक तरतूदीतून आजवर खर्च करण्यात आला आहे.अनुसुचित जाती जमाती कल्याण साठी असलेला निधी इतर ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे.ही अत्यंत गंभीर वित्तीय लूट असून सत्ताधारी पक्षाला पुन्हा सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी अनुसुचित जाती जमाती निधीचा गैरवापर करण्यात आलेला आहे.२५ कोटीचा निधी तिर्थदर्शन योजनेचे नावाने उधळपट्टी करण्यात आल्याची चौकशी करून वसुलीची कार्यवाही करणे बाबत आणि ही योजना बंद करण्याचे मागणी साठी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि समाज कल्याण आयुक्त ह्यांचे कडे तक्रार दाखल केली आहे.
ह्यापूर्वी सरकार अनुसुचित जाती जमाती विकासाचा निधी अखर्चित ठेवून तो मार्च महिन्यात इतर ठिकाणी वळवित होते.मात्र आता मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नावावर अनुसुचित जाती जमाती विकासाचा निधीवर दरोडा टाकण्यात आला आहे.एकीकडे विद्यार्थी विद्यार्थिनी ह्यांना शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, स्वाधार योजनेचा लाभ देण्यात अक्ष्यम्य दिरंगाई केली जाते.तर दुसरीकडे अनुसुचित जाती जमाती विकासाचा निधी देशभरातील ७३ आणि महाराष्ट्रात ६६ धार्मिक स्थळांचे मोफत तीर्थ यात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं खर्च केला आहे.त्यात अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याच्या पात्र व्यक्तींना प्रवास, निवास आणि भोजन खर्च कव्हर करण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान दिले गेले आहे.
अनुसुचित जाती जमाती पुढे शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि माणूस म्हणून जगण्याचा मोठा प्रश्न असताना त्यांना वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील धार्मिक स्थळं तसेच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी , विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्र्यूज चर्च, याशिवाय नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी ह्या ठिकाणी तीर्थ दर्शन ह्या गोंडस नावाखाली कर्मकांड आणि धार्मिक अधिष्ठान ह्यासाठी प्रवृत्त केले जाते आहे.
कुठल्याही सरकारचे हे काम नाही.त्यामुळे अश्या प्रकारे अनुसुचित जाती जमाती हक्काचा निधी तीर्थ दर्शन योजनेत खर्च करण्याची योजना तातडीने बंद करण्यात यावी.अशी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून मागणी करण्यात येत आहे.सोबत ज्यांनी अनुदान घेतले ७२२५ लाभार्थी ह्याची चौकशी करून तातडीने व्याजासह हा निधी वसूल करण्यात यावा.करीता सदर तक्रार करण्यात आली आहे.सरकारने त्यावर तातडीने कार्यवाही न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी देखील वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत