देशातल्या नागरिकांना बहुप्रतिक्षित स्वप्न गेल्या १० वर्ष पूर्ण झाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन…

युवा शक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीब हे देशाच्या विकासाचे चार आधारस्तंभ आहेत असं त्या म्हणाल्या. अयोध्येत राममंदिर उभारण्याचं स्वप्न गेली काही शतकं लाखोंनी जोपासलं होतं याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. देशातल्या नागरिकांना गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षा असलेली अनेक कामं गेल्या एक दशकात पूर्णत्वाला गेल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. संविधानाचं कलम ३७० रद्द करणं, त्रिवार तलाक पद्धती बंद करणं इत्यादी महत्त्वाचे निर्णय आपल्या सरकारने घेतले. भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली असून आता ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. गेल्या १० वर्षात २५ कोटी देशवासीय दारिद्र्यरेषेच्या वर आले. नमो भारत रेल्वेगाड्या, अमृत भारत आणि 5 जी नेटवर्क या सुविधा, महिलांसाठी लोकसभेत आणि राज्य विधानसभेत आरक्षण देणारा नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा, न्यायसंहिता, खासगी माहितीच्या सुरक्षिततेसाठीचा कायदा, १० कोटींहून अधिक लहान शेतकऱ्यांना लाभ, बँकिंग यंत्रणेचं मजबुतीकरण, दुर्गम भागात प्रथमच विकास. लाखो आदिवासी कुटुंबांना प्रथमच वीज आणि स्वच्छ पाणी या आणि अशा अनेक कामांचा उल्लेख राष्ट्रपतींनी अभिभाषणात केला. यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री उद्या आगामी आर्थिक वर्षाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या दृष्टीने गेल्या वर्षभरात जी-20 संघटनेचं यजमानपद मिळाल्याची संधी घेऊन सरकारने रोजगार आणि आर्थिक विकासाची अनेक दालनं खुली केली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढवला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत