“शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे” मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला इशारा.

काय म्हणाले जरांगे पाटील?
“मी तुमच्याशी खरं बोलतो आहे. आमदार झाल्यावर काही लोक जात पाहू लागले आहेत. आम्ही जात पाहिली नाही. तरीही काहीजण आपला अपप्रचार केला जातो आहे. आम्हाला सांगण्यात आलं होतं कुणाला अटक होणार नाही आणि गुन्हे मागे घेतले जातील. गिरीश महाजन यांना माझा सवाल आहे की अजून गुन्हे मागे का घेतले नाही? आमचे लोक का अटक केले? शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे” असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत मग आरक्षण घेणारच. आम्ही सरसकट आरक्षणच घेणार अशी घोषणा आज मनोज जरांगे पाटील यांनी जळगावातून पुन्हा एकदा केली. आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न करु नका ही तुम्हाला विनंती आहेत. आमच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. तरीही आरक्षण दिलं नाहीत तर गाठ आमच्याशी आहे हा तुम्हाला जाहीर इशारा आहे असंही मनोज जरांगे पाटील सरकारला उद्देशून म्हणाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत