आज धर्मांतर घोषणेचा ८८वा वर्धापन दिन.

१३ ऑक्टोबर १९३५ साली येवले (जि. नाशिक) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल मुंबई इलाखा परिषदेत (धर्मांतर परिषद म्हणून प्रसिध्द) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की, “माझ्या दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू म्हणून मी जन्माला आलो. ही उणीव दूर करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. परंतु अस्पृश्य म्हणून मला भोगाव्या लागणाऱ्या अपमानास्पद नियमांपुढे मान वाकवण्याचे नाकारण्याचे, हिंदू धर्माचा त्याग करण्याचे माझ्या स्वाधीनच आहे. मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.” या परिषदेचे स्वागताध्यक्ष विंचूरचे अमृतराव रणखांबे होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत