लोकशाही विषयी बाबासाहेबांचे विचार जे घटनेत नमूद केले…

डॉ बाबासाहेब आंबेडकर…
संदर्भ —माझी आत्मकथा. पुष्ठ क्रमांक —
१०५-१०६
लेखक –डाॅ बाबासाहेब आंबेडकर
संकलन –शशांवा.
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक, सिडको, नांदेड.
लोकशाही म्हणजे लोकांच्यासाठी
चालविलेले राज्य स्वीकारण्यास
ते तयार आहेत.
लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी
चालविलेले राज्य या तत्त्वाची मूर्ती
आपण ज्या घटना मंदिरात प्रस्थापित
केलेली आहे.
ते घटनामंदिर आपणाला जर पवित्र
वातावरणात सुरक्षित ठेवायचे असेल
तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड पडून राहिलेली आहे.हे समजावून घेण्यास आपण वेळ
घालविता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालविलेले राज्य चांगले,अशी जनतेत जागृती व्हावयास हवी.
ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यास आपण काडीचाही कसूर
करता कामा नये.
देशसेवा करण्याचा हा एकुलता
एक मार्ग होय.याशिवाय दुसरा मार्ग
मला तरी दिसत नाही.
भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी जी घटना तयार केली,तीत
पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे,ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिले चरण
धम्मचक्रप्रवर्तनाचे घातले आहे.ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष जी.पी.माबासेकर
यांच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे हे
पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले.
तीसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंट
निशाणावर अशोकचक्र हे भारत सरकारचे प्रतिक म्हणून घटनेत मान्य
करून घेतले आहे.
हे सर्व करताना मला हिंदू , मुसलमान, ख्रिश्चन व पार्लमेंटमध्ये इतर सभासदांचा विशेष विरोध झाला
नाही.इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन
मी पार्लमेंटमध्ये केले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत