दावोस दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती…

गेल्या वर्षी झालेल्या एक लाख सदोतीस हजाराच्या सामंजस्य करारा पैकी ८० टक्के करार पूर्ण करण्यात आले होते. दावोसचा ३ दिवसांचा दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल मुंबईत परतले. या दौऱ्यात तीन लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून, एक लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
याशिवाय ह्युंडाई कंपनी सोबत ६ हजार कोटी रुपयांचे, सामंजस्य करार करण्यात आले, यामुळे राज्यात साडे चार हजार युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधांसाठी या दौऱ्यात हिताची एम जी आर एम नेट या कंपनीसोबत भागीदारी करार करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत