
मुंबईत विधान भवनात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मी दिलेला निकाल कायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिला असल्याचं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनं निवडणूक आयोगाला केवळ पक्षांतर्गत निवडणुकीची माहिती दिली, घटनादुरुस्तीची माहिती दिली नसल्याचा दावा नार्वेकर यांनी केला. निवडणूक आयोगाकडे केवळ १९९९ ची घटना उपलब्ध होती, त्यामुळं तीच ग्राह्य धरली, असं ते म्हणाले.निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेनुसार निर्णय घ्या, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं. सर्व निर्णय घेताना शिवसेना पक्षाची घटना विचारात घेतली. पक्षातल्या नेत्यांचे पक्षाध्यक्षांसोबत मतभेद झाले म्हणजे त्यांनी पक्ष सोडला असं होत नाही, असं नार्वेकर म्हणाले. या घटनेनुसार पक्ष संघटना आहे का हे पाहिलं आणि हे नव्हतं त्यामुळं विधीमंडळातलं बहुमत ग्राह्य धरलं आणि त्यानुसार निर्णय दिल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं. पक्षाध्यक्षांच्या निर्णयाला राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा हवा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत