गुलामांनो झोपलात ना असेच झोपून रहा….!!!

समाज माध्यमातून साभार………………… न्यायाधीशाच्या घरी पण आई, बहीण, बायको, मुलगी आणि इतर महिला नातेवाईक नक्की असतील मग त्यांच्या बाबतीत असंच झालं त्यांच्या पैकी कुणी मेल आणि त्या मृतदेहा सोबत कोणी संभोग केला तर न्यायाधीश पेढे वाटून DJ लावून हा अघोरी आनंद साजरा करतील काय? देशात मनुस्मृती अशीच टप्या टप्प्याने लागू केली जात आहे. खर तर हा निकाल त्या मनुस्मृती समर्थक नसलेल्या मेंदूची देणं आहे. हा निकाल म्हणजे हिंदू धर्मातील नागा साधू जो अघोरी प्रकार करतात मृत महिलेच्या देहा सोबत संभोग करतात. त्या अघोरी परंपरेला समर्थन म्हणून हा निकाल देण्यात आला आहे.
मग जर हा अघोरी प्रकार न्यायपालिकेला मान्य असेल तर लहान लहान चिमुकल्या मुलीनं वर तसेच वयोवृद्ध महिलांवर जे अत्याचार आणि बलात्कार करतात त्यांना तर पुरस्कार आणि आजीवन पेन्शन हि न्यायपालिका चालू करेल. फक्त ती महिला किंवा बालक न्यायाधीशाच्या घरातील किंवा संबंधातील असल पाहिजे. भारत देश कुठे चालला आहे याचं हे सुंदर आणि जिवंत उदाहरण आहे. अमेरिका आणि चीन सारखे देश विज्ञानाची कास धरुन जगावर अधिराज्य गाजवण्याची स्वप्ने पाहत आहेत. आणि आमचा देश हजारो वर्षे इतिहासात काय झालंय आणि त्याचा पोकळ दंभ बाळगण्यासाठी हजारो वर्षे मागे जात आहे. कुणी गाई सारख्या प्राण्याच्या शेणात जीवनसत्वे शोधत आहेत तर गोमुत्रात आमृत शोधत आहेत. पोटाला चिमटा काढून सामान्य भारतीय आपली धन संपदा आणि पैसा कुत्र्याच्या छत्र्या प्रमाणे उगवलेल्या बुवा, बाबा, साधू आणि साध्विंच्या चरणावर स्वाहा करत आहेत. आणि गुन्हेगार लोक वेडे आणि मनोरुग्ण लोक हे साधू आणि साध्वी बनून सामान्य भारतीयांना मुर्खात काढण्याची मीठ मोठाली दुकाने आणि मठ स्थापन करत आहेत.
मी पुण्यातील एका खेडे गावात सध्या रहात आहे. गेल्या सहा महिन्यात या गावात किधावधी रुपये खर्चून एक अनामिक देवाचं मंदिर उभ केलं आहे. ज्या देवाचं नाव मला माझ्या वयाच्या ४२ पर्यंत म्हणजे काल पर्यंत तरी माहीत नव्हतं. लोक अशी मंदिरे आणि इतर धर्माची धार्मिक स्थळे उभारण्यासाठी खुल्या हाताने दान करत आहेत. आणि याच लोकांना शैक्षणिक कार्यासाठी देणगी मागितल्यावर या लोकांच्या अंगावर “विष्ठा” पडल्यासारखं हे लोक अंग झटकत असतात. ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत आहे तो समाज एक तर उच्च शिक्षण घेऊन आत्ममग्न होऊन समाजाच्या हो मध्ये हो मिसळत आहे किंवा विदेशात जाऊन आपला रोजगार शोधत आहे. आणि सर्वसामान्य भारतीय म्हणजे मध्यमवर्गीय समाज मग तो कुठल्या का समाजाचा किंवा धर्माचा असेना त्याला धर्माची इतकी नशा झाली आहे की त्याच्या सोबत इथली राज्यव्यवस्था, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे की त्याच्या भविष्याला “घोडे” लावण्यासाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहेत.
न्यायपलिकेला आणि लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या तसेच इथल्या गुलाम झालेल्या प्रशासन व्यवस्थेला एक तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता आहे किंवा पैशाची अघोरी भूक लागली आहे. या पैकी एकाच पण सामान्य मध्यम वर्गाशी कांहीं देणं घेणं नाही. त्या मुळे भारत देशात धार्मिक अराजकता आणि राजकीय अनधिकृत हुकूमशाही उदयास आली आहे. त्या मुळेच असले निकाल आता या पुढे येत राहणार आहेत. सामान्य माणूस स्वतःच्याच गुलामीची येथे रोज मिरवणूक काढत आहे…..!!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत