“POWER आणि POSITION” यात फरक आहे असे बाबासाहेब म्हणत.

“POWER आणि POSITION” यात फरक आहे असे बाबासाहेब म्हणत. युरेशियन ब्राह्मणांनी आमच्या लोकांना POSITION दिली , POWER दिलीच नाही आणि आपले लोक POSITION ला, POWER म्हणू लागले, समजू लागले. हा एक भ्रम आहे आणि भ्रम एक मानसिक आजार आहे.
POSITION म्हणजे पद. ते तुम्हाला आमदार करतील, खासदार करतील, मंत्री करतील, उपमुख्यमंत्री करतील, मुख्यमंत्री करतील परंतु निर्णय घेण्याचा अधिकार देणार नाहीत. तो HIGH COMMAND कडेच राहील. मंत्रीपद, लाल दिव्याची गाडी, दरवाजा उघडायला ड्रायव्हर, बंगला, नोकर-चाकर……याला POSITION म्हणतात POWER नव्हे. आमच्या लोकांना त्यांनी POSITION दिली, पण POWER दिलीच नाही.
आज देखील 85% बहुजन समाजातील आमदार-खासदारांना दिल्लीला जाऊन पुढे झुकावे लागते, वाकून मुजरा करावा लागतो.
जसे शेतकरी शेतात बुजगावणे उभे करतो, ते कशासाठी ? पक्षांना घाबरविण्यासाठी. पक्षांना वाटते, हा शेतकरीच आहे, परंतु ते असते बुजगावणे. तसे महाराष्ट्रातील व देशातील जनतेला वाटते, हा मुख्यमंत्री आहे, परंतु ते असते बुजगावणे. जसे विलासराव, अशोक राव, नारायणराव. …इत्यादी. ..हे सगळेच राव, कारण सत्ता ब्राह्मणांची आहे आणि त्यांनी 85% बहुजन समाजातील आमदार खासदारांना POSITION दिली, POWER दिलीच नाही. हा सर्व पुणे कराराचा परिणाम आहे. त्यामुळे काय होते ? महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणारे-दिल्लीत विनवण्या कराव्या लागतात. महाराष्ट्रात गुरगुरणार्याना -दिल्लीत म्याॅव म्याॅव करण्याचाही अधिकार नाही.
जे बंडाची भाषा करतात ते दिल्लीत थंड होतात. जे आक्रस्ताळेपणा करतात त्यांना दिल्लीत शांत बसावे लागते, तडजोड करावी लागते. महाराष्ट्रात जे संघर्षांची भाषा करतात त्यांना दिल्लीत शरणागती पत्करावी लागते. कारण दिल्लीची सत्ता ब्राह्मणी पक्षांच्या ब्राह्मणांच्या हाती आहे. दिल्लीची सत्ता कुठल्याही बहुजन पक्ष्याच्या हाती नाही. जे महाराष्ट्रात वाघ सिंह असतात ते दिल्लीत शेळ्यामेंढया बनतात. महाराष्ट्रात एकमेकांच्या नरडीचा घोट घेणारे दिल्लीत गेल्यावर गळाभेट करून माघारी येतात. आताच्या बहुजन पक्ष्यांच्या मुख्य पदावर ब्राह्मणांनी प्रवेश केल्यामुळे हे बहुजन पक्ष निष्प्रभ ठरले आहेत.
याची समिक्षा सामान्य माणूस करू शकला नाही, निरिक्षण करू शकला नाही. एक दुर्भाग्य….. आपल्या बर्याच लोकांना – PRIME MINISTER या इंग्रजी शब्दाचे साधे भाषांतर सुध्दा करता येत नाही. -PRIME म्हणजे प्रधान, MINISTER
म्हणजे मंत्री. अर्थात PRIME MINISTER या शब्दाचे भाषांतर आहे -प्रधानमंत्री. आणि आपले लोक, कार्यकर्ते, नेते, मंत्री, प्रचार-प्रसार माध्यमे PRIME MINISTER या शब्दाचे भाषांतर “पंतप्रधान”असे करतात. कारण पंतच (युरेशियन ब्राह्मण) प्रधान हवा असतो.
भारतीय संविधानातील पहिलेच कलम आहे- India that is BHARAT घटनाकारांनी 395 कलमांपैकी -पहिल्या व एकमेव कलमाचे मराठीत भाषांतर करून दिले आहे. काय मराठीत भाषांतर केले आहे ? India that is BHARAT म्हणजे संविधानाच्या पहिल्या कलमाने देशाचे नाव निश्चित केले आहे – भारत.
बाबासाहेबांनी असे का केले?
कारण बाबासाहेबांना माहीत होते की माझ्यानंतर हे चलाख युरेशियन ब्राह्मण INDIAचे भाषांतर हिंदुस्थान करतील.असे करू नये म्हणून बाबासाहेबांनी INDIA THAT IS BHARAT असे भाषांतर जाणीव पूर्वक करून ठेवले आहे.
संदर्भ :- मराठा, ओबीसी, कुणबी.
आरक्षणाचा तिढा (समस्या) राष्ट्रव्यापी आंदोलनाशिवाय सुटणार नाही. ( MR. D.R.OHAL SIR , BAMCEF , BHARAT MUKTI MORCHA )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत