संघ भाजप मनूवाद्यांनी उगाच देशाला देशभक्ती शिकवायच्या फंद्यात पडू नये!

समाज माध्यमातून साभार
भीमा कोरेगाव लढाई नंतर पेशवाई ईस्ट इंडिया कंपनीला शरण गेली. पेशव्यांना कंपनीची पेंशन सुरू झाली. किती? वार्षिक ८० हजार पौंड! (काहींच्या मते १ लाख पौंड!) ती १८५१पर्यंत सुरू होती.
बाजीराव दुसरा १८५१ ला मेला. नानासाहेब पेशवा त्याचा दत्तक मुलगा होता. नानासाहेबचे खरे नाव धोंडोपंत नारायण भट असे होते. दुसऱ्या बाजीरावाने त्याला दत्तक घेतले. दुसरा बाजीराव मेल्यावर कंपनीने पेंशन बंद केली. त्यात लॉर्ड डलहौसी आला. त्याने दत्तकविधान नामंजूर केले.
एकीकडे पेंशन बंद केली, दुसरीकडे दत्तकविधान नामंजूर केले.
म्हणून नानासाहेब पेशव्याने १८५७ च्या उठावात सहभाग घेतला.
जर दोन्हीपैकी किमान पेंशन जरी चालू असती तरी नानासाहेबला कंपनीशी काही अडचण नसती.
सावरकरांनी पहिले स्वातंत्र्य समर मध्ये पेशव्याचे अतिरंजित वर्णन केले.
आणि १९२४ ला सावरकर रत्नागिरीच्या घरी नजरकैदेत राहू लागले.
१ ऑगस्ट १९२९ पासून सावरकर देखील पेशव्यांच्या प्रमाणे ब्रिटिशांकडून पेंशन घेऊ लागले.
रूपये ६० प्रतिमाह!
तेंव्हा ब्रिटिश सरकारच्या कलेक्टरचा पगार होता रूपये २२ प्रतिमाह.
भीमा कोरेगाव दिनी दुसरा बाजीराव, नानासाहेब पेशवा आणि सावरकर या तिघांच्याही ब्रिटिश पेंशनची आठवण झाली.
त्यामुळे संघ भाजप मनूवाद्यांनी उगाच देशाला देशभक्ती शिकवायच्या फंद्यात पडू नये!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत