जातीची माती खाऊन तोंडांची चव घालवू नका….!!

समाज माध्यमातून साभार
सवर्ण रामायणातील घडामोडींना आदर्श मानून आपल्या सत्तेचे प्रयोग करीत असतात….!!
रामराज्य आणायचे हा त्याचाच एक भाग आहे. रामराज्यात मुठभरांची सत्ता आणि बहूजनांची हक्क मारी हा मुख्य उद्देश आहे….!!
रामायणातील राम आणि रावणाच्या संघर्षात रामाने फितूरीने रावणाचा पराभव केला.रामायणात रावणाचे राज्य संपविले. कसे तर त्याचा भाऊ बिभीषणाला राजेपदी बसवणार असे आमिष देऊन….!!
लोभाच्या आहारी गेलेला बिभीषण आपल्या भावाचे राज्य आणि सोन्याने मढवलेली राजधानी लंका जाळून राख करून बसला हेच रामायण सांगतेय…!!
अगदी त्याचं रितीने आता पुन्हा रामराज्य आणायचे आहे. रामायणात रावणाची सोन्याची लंका जाळून राख केली. आता सोन्यासारखे मौल्यवान संविधान संपवायचे आहे. संविधान संपवण्यासाठी आरक्षित संवर्गातील लोकांना राष्ट्रपति,सरन्यायाधिश,अशी मोठमोठी पदे देण्याचा प्रयोग सुरु झालेला आहे….!!
हा काही योगायोग नाही. हा षढयंत्राचा भाग आहे.
जशी रावणाची लंका जाळून राख करण्यासाठी फितूरीने बिभीषण तयार केला. अगदी तशाच प्रकारे संविधान संपवण्यासाठी बिभीषण तयार करून वापरले जातं आहेत….!!
एस. सी. राष्ट्रपती बनविला आणि त्याच्या अखत्यारीत संविधानाची मोडतोड सुरू केली. कित्येक कायदे पायदळी तुडविले. हुकूमशहा मुजोर झाला.आणि त्याच राष्ट्रपती ला पदावर असतांना मंदिरात गेल्यावर त्याची औकात दाखवून दिली. तु अस्पृश्य आहेस हे जगजाहीर दाखवून दिले. तेव्हा जनतेच्या लक्षात आले अरे हे तर बुजगावणे होते….!!
एस. टी. राष्ट्रपती बनविला आणि एस. टी समुहातील मणिपुर मधील आदिवासी समाज एकमेकांच्या जीवावर ऊठले. नव्हे भाऊ भावाचा जीव घेऊ लागला.कित्येकांचे गळे चिरले महिलांची सरेआम नग्न करून धिंड काढल्या गेली. देशातील मानवता शरमेने व्याकूळ झाली परंतु राष्ट्रपती पदी असलेली व्यक्ति काहीच करु शकली नाही हा अनुभव ताजा आहे….!!
सरन्यायाधीश पदावर बसवण्या अगोदर एस. सी न्यायाधीशाच्या हातून एस. सी आरक्षणाचे ऊपवर्गीकरण करुन घेतले आणि क्रिमिलेअर लावून एस. सी आरक्षण संपवण्याचा कट यशस्वी केला गेला….!!
ज्यांना ज्यांना मोठ्या पदावर माझ्या जातीचा माणूस बसला आहे म्हणून आनंद होतं असेल त्या प्रत्येकाचा आनंद म्हणजे बिभीषण राजा होण्यासाठी ज्या भाबड्या आशेवर बसला होता.परंतू राजा झाला नाही.तसा तुमचा भाबळा आनंद आहे…!!
हा सवर्णांचा सत्तेचा खेळ आहे. सवर्ण सत्तेच्या खेळात माहीर आहेत. ते सत्तेसाठी वाट्टेल ते करतात. विरोधी छावणीतील माणसांना मोक्याच्या जागेवर बसवून ते हातातील सत्तेच्या दो-या सैल होऊ देणारे नाहीत….!!
मोक्याच्या जागेवर लोभी बुजगावणे बसवून त्याच्या हातून संविधान संपवायचे आहे…!!
संसद, मिडिया, न्यायपालिका, निवडणूक आयोग अशा सर्वच संस्था बटीक बनवून सवर्णांच्या सत्तेचा उधळलेल्या वारुला एक माणूस वेसन घालू शकेल का.???
जातीपेक्षा, विचाराची माणसे कामाची हे आतातरी समजून घ्या. हुरळून जाऊ नका. भाबड्या आशेवर जगू नका.ही विचारांची लढाई आहे. संविधान × मनुस्मृती….!!
संविधानवादी छावणी एका बाजूला आहे. मनुवादी छावणी दुसऱ्या बाजूला. जो मनुवादी छावणीत सामील झाला तो तुमच्या विचाराचा कसा.???
जयभीम.🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत