
पुढील २ दिवस उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके असेल आणि त्यानंतर ते कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली,पंजाब,हरियाणा,चंदीगड, व राजस्थानमध्ये पुढील २ दिवस तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता असून तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असे भारतीय हवामान विभागनं म्हटले आहे. सोमवारपासून राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात वादळ आणि गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.पुढील ४ ते ५ दिवसांत तमिळनाडू,केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत