प्रतित्यसमुत्पादाचा सिद्धांत भाग २३

भगवान बुद्धांचा प्रतित्यसमुत्पादाचा सिद्धांत दोन प्रकारे मांडल्या जाते.
१. अनुलोम प्रतित्य समुत्पाद
अविद्येमुळे संस्काराची उत्पत्ती, संस्कारामुळे विज्ञानाची उत्पत्ती, विज्ञानामुळे नामरुपाची उत्पत्ती, नामरुपामुळे षडायतनची उत्पत्ती, षडायतनमुळे स्पर्शाची उत्पत्ती, स्पर्शामुळे वेदनेची उत्पत्ती, वेदनेमूळे तृष्णेची उत्पत्ती, तृष्णेमुळे उपादानाची उत्पत्ती, उपादानामुळे भवाची उत्पत्ती, भवामुळे जातिची (जन्म) उत्पत्ती, जातिमुळे जरा-मरण-दु:ख-शोक-चिंता आदीची उत्पत्ती… या क्रमाने पुढे धावणाऱ्या या भवचक्राला ‘अनुलोम प्रतित्य समुत्पाद’ म्हणतात.
२. प्रतिलोम प्रतित्य समुत्पाद
अविद्येचा निरोध केल्याने संस्काराचा निरोध होतो. संस्काराचा निरोध केल्याने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाचा निरोध केल्याने नामरुपाचा निरोध होतो. नामरुपाचा निरोध केल्याने षडायतनचा निरोध होतो. षडायतनचा निरोध केल्याने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाचा निरोध केल्याने वेदनेचा निरोध होतो. वेदनेचा निरोध केल्याने तृष्णेचा निरोध होतो. तृष्णेचा निरोध केल्याने उपादानाचा निरोध होतो. उपादानाचा निरोध केल्याने भवाचा निरोध होतो. भवाचा निरोध केल्याने जातिचा (जन्म) निरोध होतो. जातिचा निरोध केल्याने जरा-मरण-दु:ख-शोक-चिंता आदीचा निरोध होतो. अशाप्रकारे उलट मांडलेल्या सिद्धांतास ‘प्रतिलोम प्रतित्य समुत्पाद’ असे म्हणतात.
प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांच्या अस्तित्वामुळेच दुसऱ्याचे अस्तित्व आहे. पहिले जर नष्ट झाले तर दुसऱ्याची उत्पत्ती होणार नाही. कारणांमुळेच कार्य निर्माण होते. म्हणून कार्य नको असेल तर त्याच्या कारणाचा नाश करणे आवश्यक राहील.
या सिद्धांतानुसार कोणतीही वस्तू स्थिर, अक्षय, चिरंतन अथवा शाश्वत नाही. प्रतिक्षण ती नव्या कार्याला जन्म देत राहते.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.५.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत