तगर भूमी बौद्ध धम्म परिषद रविवार दि. 7 जानेवारी 2024 सकाळी 10:30 पासून…

भंते सुमेधजी नागसेन
9960498358
आपला वारसा संघर्षाचा
आपला वारसा नव निर्मितीचा….
तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हा म्हनुन दोन हजार वर्षां पूर्वी आपल्या पूर्वजांनी चैत्य, स्तूप- विहार , लेण्या निर्माण करून आपल्या साठी वारसा दिला .
आपल्याला अजिंठा लेणी , कार्ला भाजे लेणी , वेरूळ लेणी ,खरोसा लेणी , संन्नती चा स्तूप, तेरचं चैत्य सहज मिळालं नाही ,
आपल्या पूर्वजांनी लेणी कोरताना स्वताचे रक्त गोठवले आहे , लेणी कोरताना अनेकांच्या डोळ्यात खडे गेली असतील , दगडात बुद्ध कोरता कोरता अनेकांची बोटे तुटली असतील . स्तूप लेण्या निर्माणासाठी अनेकांनी आपले सर्वस्व अर्पण केले म्हनुन तर आज आपल्याला जागोजागी बुद्ध दिसत आहेत.
दोन हजार वर्षां पूर्वी जेसिबी, टॅकटर, किंवा कोणतीच इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक साधनं उपलब्ध नव्हती तरी आपल्या पूर्वजांनी मोठमोठ्या डोंगरांच्या छातीत बुद्ध कोरलेत.
आपला इतिहास संघर्षाचा आणि नवनिर्मितीचा आहे .
उस्मानाबाद ( धाराशिव ) जिल्ह्य़ातील एकमेव निसर्गरम्य ठिकाण म्हनजे गडदेवदरी .
गडदेवदरी च्या डोंगरावर जमिनी पासून चारशे फुट उंच डोंगरावर आपण तगर भूमीची नवनिर्मिती करत आहोत. कळंब – उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटिल यांच्या विकास निधीतून 25 लाखाचे सभागृह ( धम्म हाॅल ) चे काम पूर्णत्वास आले आहे. बौद्ध उपासकांच्या दानातून 10 लाख रूपयांचे भिख्खू निवास निर्माण केले आहे.
पुढील काळात वस्तीगृह – शाळा – हाॅसपिटल , विहार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
अवघड असलं तरी अशक्य नाही कारण आपला वारसाच संघर्षाचा आणि नवनिर्मितीचा आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत