पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. – त्यावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
पंकजा मुंडेंनी डोळ्यांना चष्मा लागल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याचं सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे व्हिडीओमध्ये म्हणाल्या, “एक मिनिट सरप्राइज.. ताईला चष्मा लागला.. ताईला चष्मा लागला.. लांबचा चष्मा नाही बरं का.. जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. चष्म्याचा नंबर कमी आहे. पण मला आता जवळचं स्पष्ट दिसेल. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही चांगलं दिसतंय. कसा वाटतोय चष्मा?”
“पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की, त्या शिंकल्या आणि हसल्या तरी बातमी होती. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत