कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

दंगलीतून मनुस्मृतीचे पालकत्व

प्रत्येक बऱ्या वाईट घटनांची नोंद इतिहासात होत असते आणि तशी नोंद भारतीय इतिहासात पण व्हायलाच पाहिजे होती. भूतकाळात या देशात विषमतावादी लोकांनी भारतीय इतिहासाचे लेखन केलेले आहे आणि अर्वाचीन काळात समतावादी चष्म्यातून इतिहासाचे लेखन होत आहे. परंतु विशेष म्हणजे अर्वाचीन काळात ज्याप्रमाणे इतिहास दंगलीची नोंद घेत आहे तशी दंगलीची नोंद प्राचीन इतिहासात विषमतावादी लोकाकडून झालेली दिसत नाही. मानवाचे शरीरावर आणि त्याच्या शारीरिक कृतीवर नियंत्रण ठेवण्याचे उद्देशाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की या देशात युद्ध झाले, खून झाले, विषकन्यांचे विवाह झाले, कर्मकांड झाले, यज्ञ झाले आणि ज्याला आजच्या भाषेत आतंकवाद, दहशतवाद म्हणता येईल तो अति महाभयंकर आतंकवाद दहशतवाद प्राचीन काळातही झाला ज्याचे उदाहरण त्या काळातील झालेल्या बौद्ध भिक्खूंच्या हत्येचे फरमान होय. प्रत्येक भिक्खूचे शीर कापून त्या शिराला नारळा प्रमाणे फोडून विद्रूप करण्यात येई. इथे हे पण आवर्जून लक्षात असू द्यावे की भिकू संघात फक्त पुरुषच नव्हते तर महिला पण होत्या. हा त्या काळातील इतका क्रूर आतंकवाद होता की या आतंकवादासमोर अर्वाचीन काळातील हिटलर आणि मुसोलिनी ची क्रूरता पण तोकडी पडेल.

शरीरावरील नियंत्रणाचे हे लचांड, हा सिशीतील जिन्न इथेच स्वाहा झाला नाही याउलट समतावादी मूलनिवासी जनतेच्या मनावर, मतावर, बुद्धीवर, विचारधारेवर ताबा मिळविण्यासाठी त्या काळात जगातील सर्वात जास्त तिरस्करणीय नियमावली मनुस्मृती ची निर्मिती करण्यात आली, आणि त्याला देवाच्या धर्माच्या आज्ञा म्हणून मूलनिवासी जनतेच्या मन मस्तीषकावर बिंबविण्यात आले आणि त्याची क्रूरतेने आणि अत्यंत टोकाच्या निर्दयतेने अंमलबजावणी करण्यात आली. मूलनिवासी गुलामांची यातून पिढ्यान पिढ्या सुटका होऊच नये म्हणून भाग्य भगवान, जन्म पुनर्जन्म, पाप पुण्य सारख्या स्वकल्पित संकल्पनांचा प्रसार आणि प्रचार करण्यात मनुवाद्यांनी आपली अफलातून शक्ती खर्च केली. त्यासाठी त्यांनी मूलनिवासी गुलामांचे शिक्षणावर बंदी आणली आणि गुरुकुल पद्धती आणून शिक्षण स्वतःसाठीच प्रायव्हेट केले, मर्यादित केले. एवढेच नव्हे तर मूलनिवासी गुलामांची जाती-जातीमध्ये विभागणी केली आणि क्रमिक असमानतेच्या निशाणीवर ही ओळख, ही निशाणी त्यांना चिकटवून दिली. मराठीमध्ये आजही सीढी ला “निशाणी” म्हणूनच संबोधतात.

मनुस्मृतीचा अंमल सुरू झाला. सामाजीक तसेच धार्मिक पटलावर मनुस्मृतीचे राज्य स्थापन झाले,आणि कीळसवाणा, तिरस्करणीय, असंवैधानिक,अमानवीय, कृरतेलाही आणि बेशर्मीला ही लाजवेल असा शैतानी नंगा नाच या देशात हजारो वर्ष, पिढी दर पिढी चालत राहिला.

1.त्यात शिक्षणावर बंदी, 2.पेशवे कालीन कंचुकी प्रथा, 3.स्तन टॅक्स आणि त्याच्या विद्रोहात नंगेली नावाच्या महिलेने टॅक्स न भरता आपले स्तन कापून देणे, 4. लग्नानंतर सतत तीन दिवस चालत असलेली शुद्धीकरण प्रक्रिया, 5. सती प्रथा, 6. देवदासी प्रथा 7. बालविवाह, 8.विधवा स्त्रीचे मरणप्राय हाल, 9. शुभ शकुन अपशकुन, 10. भुकेलेल्याला अन्न नाही, तहानलेल्या ला पाणी नाही, 11. सूर्यप्रकाशावर बंदी, 12. पहिला पुत्र जन्माला आला की त्याला निर्दयतेने गंगेला अर्पण करणे अशा एक नाही अनेक प्रथा,अनेक कायदे मनुस्मृति ने अधोरेखित केलेले होते. हे असे कायदे आहेत की हे लिहिते वेळी माझ्या अंगावर शहारे येत आहेत तसेच मला शरम पण वाटत आहे की कसे हे सर्व मूलनिवासी जनतेसमोर मांडायचे ज्यात महिला पण वाचक राहणार आहेत. प्रत्यक्षात त्या काळात मनुस्मृतीचे पालकत्व च्या नावावर महिलांचा किती छळ झाला असेल याची कल्पनाच करवत नाही.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखे आहे की वरील सर्व हलकट,नालायक कुप्रथा या फक्त महिला संदर्भातच मांडलेल्या आहेत. त्याला कारण ही तसेच आहे की पुढे महिलांचे कर्तव्य,तिची भूमिका काय असावी याचे विवेचन समोर येणार आहे. पुरुष आणि बालका सोबत होत असलेल्या अन्यायाविषयी विस्तार भयास्तव मुद्दाम लिहिणे टाळलेले आहे. शिक्षण, महिलावरील अत्याचार, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्या,महागाई इत्यादी प्रश्नावरून आपले अपयश झाकण्याकरिता नेहमीच्या रणनीतीनुसार ब्राह्मणवाद्यांनी प्रथम “छावा” या चित्रपटाची निर्मिती केली आणि मुस्लिम द्वेष भडकवण्यासाठी त्यांच्या सोयीच्या/हिताच्या गोष्टीचाच तेवढा इतिहास त्या चित्रपटात दाखविला. आणि कबरीचा वाद उकरून आणि अपप्रचार करून नागपूरची दंगल घडविली. थोड्या वेळासाठी छावा चित्रपटातील इतिहास शंभर टक्के सत्य जरी गृहीत धरला तरी पण मनुस्मृतीच्या नावाखाली पिढी दर पिढी वर उल्लेखित केल्याप्रमाणे जो हैदोस ब्राह्मणवाद्यांनी या देशात मांडला होता त्या शैतानी, अमानवीय कृरतेबद्दल इथले ब्राम्हणवादी तसेच त्यांचे प्रसारमाध्यम अवाक्षरही पसरवायला तयार नाहीत/ नसतातच.

हे एकच उदाहरण नाही. याच्यापूर्वी दंगलीच्या हेतूने अशीच ” केरला स्टोरी ” पिक्चर काढला होता ज्याच्या निर्मात्याला नंतर सुप्रीम कोर्टात चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल माफी मागावी लागली होती. त्यापूर्वी “काश्मीर फाईल्स” काढली होती. आणि त्याही पूर्वी मशीद पाडण्यासाठी टी. वी. वर “रामायण” दाखविली होती. असे त्यांचे असंख्य नियोजन असतात जे अगदी बेमालूम पणे अमलात आणल्या जाते ज्याचे परिणाम अत्यंत संवेदनशील आणि अती घातक होतात.

या लिखाणाचे शीर्षक “दंगलीतून मनुस्मृतीचे पालकत्व” असे आहे. मनुस्मृतीला पिढी दर पिढी मजबूत करण्यासाठी “दंगल” हा विषय त्यांच्या आवडीचा विषय असून हा त्या एखाद्या घटनेपर्यंतच मर्यादित असलेला या अर्थाने मर्यादित विषय नाही. तर हा विषय निरंतर पुढे त्यांच्या अनेक पिढींनी अंमलात आणण्याचा विषय आहे. आणि म्हणून दंगलीची ही विचारधारा त्यांच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्याचा हा एजेंडा आहे. आता दंगल काय असते का घडविला जाते आणि त्याचे पुढे अनेक पिढीवर होणारे परिणाम कसे घातक असतात याचे विवेचन करण्यापूर्वी मी महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक मूलनिवासी हसन मुश्रीफ यांचे गाजलेले पुस्तक ” हू कील्ड करकरे ” मराठी आवृत्ती मधील मोजकेच उतारे इथे पुनर्लेखित करीत आहे.

1. आपल्या प्रस्तावनेत पान क्रमांक 12 वर लेखक म्हणतात की 1893 साली जातीय दंगलीचे बीज रोवल्या गेले आणि तेव्हापासून संपूर्ण विसाव्या शतक भर वाढत्या द्वेषाने आणि चढत्या त्वेषाने त्यांचे प्रमाण वाढतच गेले. अखेर त्याची परिणीती झाली बाबरी मशिदीच्या विध्वंसात आणि 2002 च्या गुजरात दंगलीत.

2. पान क्रमांक 20 : इतिहास असे सांगतो की, ब्राह्मण हे मुस्लिम विरोधी कधीच नव्हते. परंतु 1893 साली ते अचानक मुस्लिम विरोधी बनले.

3. पान क्रमांक 15 : देशात झालेल्या प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर शेकडो मुस्लिम युवकांना अटक करूनही बॉम्बस्फोट थांबत नव्हते. पण 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटानंतर खऱ्या अतिरेक्यांना अटक होताच बॉम्बस्फोट जवळ जवळ पूर्णपणे बंद झाले.

4. पान क्रमांक 47 : खरे दहशतवादी आपल्याला विरोध करणाऱ्या नेत्यांची गय करीत नाही. पण सतत चर्चेत असलेल्या भारतातील तथाकथित मुस्लिम दहशतवाद्याबाबत अशी गोष्ट आढळून येत नाही. उदाहरणार्थ वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या.

5. पान क्रमांक 48 : पण वस्तुस्थिती अशी आहे की, दहशतवादाचा बागुलबुवा अस्तित्वातच नाही. ही गोष्ट ब्राह्मणवादी उत्तम प्रकारे जाणून आहेत म्हणून तर ते निर्धास्तपणे भाषणे देत देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी भयमुक्त फिरत आहेत.

ही झाली दंगली विषयीची पार्श्वभूमी आणि त्याचे थोडक्यात केलेले विश्लेषण. यावरून असेही लक्षात येते की दंगलीच्या माध्यमातून ब्राह्मणवादी मनुस्मृतीचे पालकत्वाची जबाबदारी आवर्जून आणि गांभीर्याने मनापासून सांभाळतात. यावर आम्हाला जास्त चर्चाही करायची नाही. परंतु यापुढे मात्र मूलनिवासी बहुजन जनतेच्या दृष्टीने या लिखाणाचा, या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की मूलनिवासी बहुजन महिला, तिचे कार्य, तिचा उद्देश, तिची भूमिका आणि तिचे कर्तव्य काय असायला पाहिजे या विषयावर आमचा फोकस जास्त महत्त्वाचा आहे आणि या लिखाणाची सुरुवात पण खऱ्या अर्थाने आतापासूनच होणार आहे. शेवटी हे लिखाण चर्चेच्या स्वरूपात असल्यामुळे वाचकांच्या मनात उद्भवणारे प्रश्न पण यात समाविष्ट करायला हरकत नसावी.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणतात ” एक स्त्री शिकली, सज्ञान झाली तर ती आपले संपूर्ण कुटुंब सुधारेल. ( संदर्भ अंधारातील दीपस्तंभ 236 )

देशाला दिशा देणाऱ्या, देशात क्रांती घडवून आणणाऱ्या एका थोर महिलेचे हे विचार आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात काळया इंग्रजांनी इथल्या मूलनिवासी बहुजन जनतेला 05 किलो अन्न वाटपावर आणून ठेवलेले आहे. गरीब अजूनच गरीब गरीब होत आहे. ग्रामीण क्षेत्रात 28 रुपये दररोज कमवीणाऱ्या व्यक्तीची गणना त्यांनी श्रीमंतीत केलेली आहे. गरिबांच्या शाळा बंद पडत आहेत, शिक्षण महाग झालेले आहे, नोकऱ्या कंत्राटी कामगार म्हणून मिळत आहेत, महिलांचा सन्मान धुळीस मिळालेला आहे, महागाई वाढलेली आहे, शेतकरी विद्यार्थी कर्मचारी मजूर महिला बालक सर्वच त्रस्त झालेले आहेत. काही निवडक पाशवीक अत्याचार घडलेल्या घटना म्हणजे गोधरा, खैरलांजी, बिलकिस बानो, मणिपूर चे उदाहरण डोळ्यासमोर आहे. आणि देवदासी प्रथा सध्याच्या काळात आजही मंदिरात निर्लज्जपणे अस्तित्वात आहे. ब्राह्मणवादी निर्लज्जपणे उघड उघड मनुस्मृतीचे समर्थन करीत आहे. शिवाय मनुस्मृतीचा कळस म्हणजे विविध कोर्टाचे महिलांचा सन्मान धुळीस मिळविणारे, देशाला शरमेने मान खाली घालवणारे असंवैधानिक निर्णय पण येत आहेत.

या पार्श्वभूमीवर मूलनिवासी बहुजन महिलांनी वैचारिक युद्धात आता उतरणे अत्यावश्यक झालेले आहे. कारण जरी तुमचे वय झाले असेल तुमचा 70 _80% आयुष्य आरामात निघून गेले असेल तरी पण तुमची येणारी पिढी, तुमच्या मुली, सुना, नातवंड यासाठी येणारा काळ काही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा नाही.

1. विविध कोर्टाचे निर्णय पाहता आणि आता नुकतेच दिनांक 20 मार्च 2025 ला इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दिलेला निकाल की स्तनांना पकडणे, तिच्या पायज्यामाचा नाडा तोडणे, तिला पुलाच्या खाली ओढण्याचा प्रयत्न करणे हे बलात्काराच्या श्रेणीत बसत नाही.

2. गुजरातचे मनुवादी न्यायाधीश 17 वर्षाच्या मुलीचा गंभीर प्रश्न न सोडवता तिला “मनुस्मृती” वाचायचा सल्ला देतात.

असल्या न्यायप्रक्रियेमुळे माझी ही धारणा झाली की पुढे शिक्षण, रोजगार बंदीच नाही तर मनुस्मृतीने वर उल्लेखित केल्याप्रमाणे अन्याय अत्याचाराची पण अंमलबजावणी करण्यास हे मनुवादी मागे पुढे पाहणार नाही. सध्या मनुस्मृति काळातील देवदासी प्रथा देशातील काही भागात आजही सुरूच आहे. यावरून कशी अंमलबजावणी होऊ शकते याची कल्पना केलेली बरी. मनुस्मृती मध्ये लिहिलेले अत्याचार इथे वारंवार रिपीट करणे योग्य नाही. आर्थिक नाळ्या आवळल्या जात आहेत यावरून काय तर्क लावायचा तो लावत बसा.

हे सर्व असंवैधानिक, कीळसवाण, आणि मानविय मूल्यांचे घसरण अति वेगाने होण्याचे हे लक्षण आहेत. आणि म्हणून भारतातील मूलनिवासी महिलांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणावर येऊन ठेपलेली आहे. वेगाने येऊ घातलेल्या मनुस्मृतीच्या शैतानाला केवळ महिलाच जमिनीत गाडू शकतात. कारण तिच्या पोटच्या बाळाची पहिली गुरु ही एक महिलाच असते आणि ही महिला जी विचारधारा जोपासेल, जे संस्कार ती जोपासेल, ज्या प्रथा ती पाळेल, जे आचरण ती जोपासेल, जे कर्मकांड ती करेल ते ते सर्व संस्कार,ते आचरण त्या बाळावर पडणार आहे. आणि म्हणून मनुस्मृतीला पोषक संस्कार बाळावर पडू नये आणि भविष्यात हे बाळ मोठे होऊन मनुस्मृतीच्या दंगलीचे खाद्य होऊ नये म्हणून याची विशेष काळजी त्या महिलेने घ्यायची आहे आणि हे सर्व संघटित रित्या करायचे आहे. यात त्या महिलेला पुरुषांनी पण मदत करणे काळाची गरज आहे.

बाबासाहेब आंबेडकर म्हणतात : स्त्रियांची संघटना असावी या मताचा मी आहे. स्त्रियांना आपल्या कर्तव्याची महती समजली म्हणजे त्या समाज सुधारणेसाठी कार्य करू शकतील. ( संदर्भ : अंधारातील दीपस्तंभ 239 )

विषय औरंगजेबाचा उकरून काढला आणि दंगल उसळली. त्यामुळे याचे पूर्णत्वाने पोस्टमार्टम करणे ही तेवढेच आवश्यक आहे. दंगलीचा मतितार्थ समजून न घेता आम्ही मूलनिवासी जनता जर आज सजग होणार नाही तर पुढे अशाच दंगलीचा इतिहास घडत राहील आणि मनुस्मृती आमच्या मानगुटीवर पूर्ण ताकदीनिशी हमला करेल.

औरंगजेबाचा विषय छेडलाच तर संभाजीची हत्या कशी झाली हे सत्य पण बाहेर काढावे लागेल. संभाजी राजांच्या मृत्यूचा आदेश औरंगजेबाने दिला होता पण संभाजी राजांची जी हत्या झाली ती काळ्याकुट्ट मनुस्मृति संविधानानुसार झाली. इस्लाम मध्ये मृत्यू अशा पद्धतीने द्यावा असे मुळीच नाही. बरे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर गुढी उभारण्याचे कारण काय?

1. घट किंवा तांब्या किंवा कलश हा नेहमी सरळ ठेवला जातो. गुढी उभारते वेळी तो उलटा का ठेवतात. कारण तांब्या हे संभाजीच्या शिराचे प्रतीक आहे.

2. धर्मशास्त्रात बांबू चा वापर, कोरे कापड, आणि लिंबाची पाने हे सर्व प्रेतासाठी वापरतात.

मग गुढी उभारण्यासाठी हे सर्व शुभ कसे? बरे नेहमीच्या सवयीप्रमाणे इतिहास लपवून नवीन काल्पनिक इतिहास रचणारे आम्हाला सांगतात की रावणाच्या पाडावानंतर राम अयोध्येत आल्यावर लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या. मग हे गुढी उभारण्याचे सर्व तंत्र, प्रस्थ, कार्यक्रम संपूर्ण उत्तर प्रदेश भर असायला पाहिजे होते पण ते तिथे नसून महाराष्ट्रातच कसे काय?

3. औरंगजेबाला त्याच्या भावाच्या हत्याचे उदाहरण देऊन त्याला कमालीचा निर्दयी, कमालीचा क्रूरकर्मा ठरवितात. पण परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली आणि त्याने वडिलांच्या आज्ञेवरून आपल्या स्वतःच्या आईचे शीर कापून जमदग्नीला दिले याचे उदात्तीकरण करतात. दोघातही साम्य आहे. मग प्रचार यंत्रणेत हा दुजाभाव कशाला?

म्हणून मूलनिवासी बहुजन महिलांनो, आपले शिक्षण रोजगार आरोग्य सन्मानाचे मूळ प्रश्न सोडून इलाहाबाद हायकोर्टाचा निकाल, बिल्कीस बानो केस मध्ये झालेला बलात्कारीतांचा सत्कार इत्यादी सरकारी आणि न्यायालयीन निर्णय तसेच खोटारड्या मनुवाद्यांच्या खोट्या इतिहासाचे, खोट्या कर्मकांडाचे समर्थन करू नका. कारण तुमचे आजचे कर्मकांड तुमच्या लहान बाळांच्या मनावर कुतूहलाचा विषय बिंबवेल. हेच कुतूहल उद्याची परंपरा होईल आणि परवा हाच त्यांचा धार्मिक कार्यक्रम होईल. आणि हाच धर्म पुढे असाच पिढी दर पिढी एक आवश्यक कर्तव्य म्हणून अखंडपणे चालत राहील. ज्यात तुमच्या येणाऱ्या पिढ्या धर्माच्या नावावर फुटबॉल सारख्या इकडून तिकडे, तिकडून इकडे कापल्या जातील. आणि मनुस्मृतीच्या अंमलबजावणीनुसार वर उल्लेखित सर्व अत्याचार धर्माज्ञा म्हणून मुकुट पणे सहन करीत राहतील.

याच्या विरोधात तुमचे मजबूत संघटन होऊ नये म्हणून त्यांनी,

1. शाळा बंद करण्याचा सपाटा चालवलेला आहे. तर दुसरीकडे

2. तुम्हाला आधीच जाती-जातीमध्ये विभाजित करून ठेवलेले आहे. आणि प्रत्येक जातीला एकमेकाच्या ऊरावर बसवून तुमच्यात आपसात जात्याभिमान, जातीची श्रेष्ठता, उंच नीच भावना वृद्धिंगत केलेली आहे.

वर उल्लेखित केल्याप्रमाणे तुमच्या येणाऱ्या पिढीतील महिलावर मनुस्मृतीनुसार निरंकुश अन्याय अत्याचार होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर जातीचे भूत, जातीचा अभिमान तुम्हाला मातीत गाडावाच लागेल. जातीजातीमध्ये असलेले द्वेष नष्ट करून मजबूत संघटन तयार करावे लागेल. आणि भारतीय संविधान समजून आपल्या हक्काप्रती युद्ध पुकारावे लागेल. अर्थात हे युद्ध वैचारिक पातळीवर असेल. तर आणि तरच तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला, महिलांना सुरक्षा प्रदान करू शकाल.

मूलनिवासी बहुजन महिलांनो आणि पुरुषांनो तुम्ही याप्रमाणे तुमचे संघटन उभाराल आणि तीव्र लढ्यासाठी सज्ज व्हाल ही अपेक्षा करून मी माझ्या लेखणीला ईथेच विराम देतो.

जय भीम, जय मूलनिवासी, जय भारतीय संविधान, जय भारत.

इंजी. अविनाश धनवटे

20/03/2025

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!