
पंजाबसह उत्तर भारतात अनेक जिल्हे काल रात्रीपासून दाट धुक्याच्या सावटाखाली आहेत. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशाच्या वायव्य भागात थंडीची लाट असून आणखी ३-४ दिवस वायव्य आणि मध्य भारतात दाट धुकं राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्रविभागाने वर्तवला आहे. जालंधरसह १२ जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याबाबत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. रस्त्यांवर वाहने चालवताना अत्यंत काळजी घेण्याचा सल्ला विभागानं दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत