महाराष्ट्रमुख्यपान

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १४ बैठकांमधे मिळून १९ विधेयकं मंजूर

लोकसभेत १२ नवीन विधेयकं सादर झाली तर दोन्ही सभागृहात मिळून १९ विधेयकं मंजूर झाली.केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. संसदेचं हिवाळी अधिवेशन काल संपलं. लोकसभा निवडणुकीपूर्वीचं हे अखेरचं पूर्ण अधिवेशन होतं. या अधिवेशनात १८ दिवसात मिळून १४ बैठका झाल्या. २०१९ मधे भाजपाचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात संसदेने संविधानाचं ३७०वं कलम रद्द करणारं ऐतिहासिक विधेयक मंजूर केलं होतं, ते आता सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरलं आहे असं त्यांनी सांगितलं. ब्रिटीशांच्या गुलामगिरीचं प्रतीक असलेले फौजदारी कायदे मोडीत काढणारी भारतीय न्यायविषयक विधेयकं काल संपलेल्या अधिवेशनात लोकसभेने मंजूर केली असून ते ऐतिहासिक पाऊल असल्याचं जोशी म्हणाले. अधिवेशन काळात संसद सुरक्षेविषयी झालेल्या अनुचित घटनेचं भांडवल करुन विरोधी पक्षांनी सरकारशी असहकार पुकारला आणि संसदेच्या कामकाजात जाणून बुजून व्यत्यय आणला अशी टीका मंत्रिद्वयाने केली. या अधिवेशनात एकूण केंद्रीय कायदे मंत्री अर्जुनराम मेघवाल पत्रकारपरिषदेला उपस्थित होते. १काँग्रेसच्या खासदारांनी केवळ सभागृहाचाच नव्हे तर उपराष्ट्रपतीपदाचाही गंभीर अपमान केला आहे, असं कायदे मंत्री मेघवाल म्हणाले. ४६ सदस्यांना बेशिस्त वर्तनाबद्दल निलंबित करण्यात आलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!