अक्कलशुन्य राहूल सोलापूरकर – अशोक सवाई

(संतापजनक)
डिएनए (डिॲक्झी न्युक्लिक ॲसिड) रिपोर्ट नुसार विदेशी ब्राह्मणांचा डीएनए *R1 A1* आहे तर आपल्या मूलनिवासी बहुजनांचा डीएनए *L3 MN* आहे जे एकमेकांची दूरदूर पर्यंत जुळत नाही. त्यामुळे त्यांचे व आपले वैचारिक मतंभेद म्हणजे मुंबई ते कोलकाता असेच असू शकतात जे कधीही जवळ येवू शकते नाहीत. हे लोक आपल्या देशात विदेशी आहेत, आश्रित आहेत. ते आश्रित असूनही त्यातील काही मुठभर लोकांना २०१४ पासून जरा जास्तच मस्ती चढली आहे. जेव्हा स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवणारे राष्ट्रद्रोही वक्तव्य किंवा कारवाया करतात तेव्हा सरकारची भूमिका ‘ये आमच्या मागे लपून जा तुला कोणीही काही करणार नाही’ अशीच राहिलेली आहे. हे सरकारच्या उघड उघड नीतीवरून दिसून येते. असे अनेक उदाहरणे देता येतील. भारताच्या दयेवर जगणारे काही मुठभर मस्तवाल आश्रित आमच्याच देशातील चबिना खाऊन (चबिना म्हणजे मलिदा, मलिदा म्हणजे खाण्यापिण्याचा अव्वल दर्जाचा माल) आमच्याच महापुरुषांवर अश्लाघ्य टिका टिप्पणी करतात. ज्यांनी आमच्यासाठी रक्ताचे पाणी केले, आमच्या हितासाठी हाडांची काडे केली त्यांच्या विषयी बेताल वक्तव्ये केली तर आमच्या भावना दुखावल्या जाणार नाही तर काय होणार? ते जेव्हा आमच्या अस्मितेला विखारी नखे लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र आमच्या तळपायाची आग मस्तकात घुसते, आणि म्हणून आम्ही शांतिप्रिय, संविधान प्रिय असलो तरी कडक शब्दात/भाषेत यांचा समाचार घेणे आवश्यक आहे. तसा तो महाराष्ट्रातील आमच्या महापुरुष प्रेमींनी घेतलाच आहे. तरीही त्यांच्या समाचार वारंवार घेणे क्रमप्राप्त ठरते.
आम्ही आमच्या लिखाणात सौहार्दपूर्ण किंवा संविधानिक भाषा सोडून कोणासाठी ही विनाकारण एकेरी भाषेवर येत नाही. परंतु तुम्ही जेंव्हा आमच्या अस्मितेला विखारी नखांनी ओरबंडता तेव्हा तुच्यासाठी मानापानाची भाषेचा वापर करणे भयंकर जीवावर येते. उदा. भगतसिंग कोश्यारी (जे संविधानिक पदावर राहूनही त्यांनी महात्मा फुले व माता सावित्रीबाई विषयी असभ्य भाषा वापरली होती) शरद पोंक्षे, मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे किंवा ब्राह्मणांसाठी स्वतंत्र राष्ट्राची भयंकर मागणी करणारा शंकर अभ्यंकर किंवा शत्रू राष्ट्राला लष्करी डाटा पुरवणारा प्रदीप कुरूळकर नावाचा देशद्रोही अशा अक्कलशुन्यांची यादी मोठी आहे. याच यादीत आता राहूल सोलापूरकर नावाचा अक्कलशुन्य सुद्धा सामील झाला आहे. त्याच्या टाळक्यात अक्कल नावाची चीज राहीलेली नाही. (काही उदाहरणावरू हा राज्यसभा सदस्याचा लाभार्थी तर होवू इच्छित नाही ना? शंका आल्याशिवाय राहात नाही) हा छ. राजेंचा खराखुरा इतिहास बाजूला सारून विनाकारण बरळला. तो म्हणतो आलमगीर औरंगजेबच्या बेगमला व त्याच्या वजीराला छ. शिवाजी राजांनी ‘लाच’ देऊन ओंरगजेबच्या कैदेतून छ. राजे सुटले. आता तार्किक प्रश्न असे निर्माण होतात की जर आलमगीराची बेगम त्या काळात पडद्यात राहत होती. आपला महाल सोडून ती कुठेही जात नव्हती किंवा बादशहाच्या दरबारात सुद्धा जात नव्हती तर तिने छत्रपतींनी दिलेली ‘लाच’ कुठे आणि कशी स्विकारली? आलमगीर बादशहाचे वैभव तिच्या पायाशी बसून तिच्या सेवेत होते तरी तिला लाचेची का गरज भासली? बरं उच्च कोटीचे व अत्यंत तल्लख बुद्धीचे चारित्र्यसंपन्न असलेले महाराज ‘लाच’ तरी कसे देतील बरं? हा विचार राहूल सोलापूरकराने करायला हवा होता. या त्याच्या बेताल बरळल्यामुळे आमच्या शिवप्रेमींच्या भावना फार दुखावल्या गेल्या. त्याकाळी दख्खनचा प्रदेश सोडून साऱ्या भारतभर आलमगीराचा आलम होता. दुसरे म्हणजे त्याच्या वजीराला तरी काय कमी होती तो लाच घेईल? घेतली असती तर या लाचखोर वजीराने आलमगीराचा आलम केव्हाच मोडीत काढत स्वतः आलमगीर झाला नसता का? कारण लाचखोर माणसाच्या अघोरी इच्छा वाढत जात असतात. तुम्ही वरील लोक ज्या देशात खाता, राहता त्याच देशाशी बेईमानी करता. हा तुमचा इतिहास सांगतो. आणि इतिहासाला तुमच्यासारखं खोटंनाटं बोलण्याची सवय नाही. तुम्ही त्याच नजरेने इतरांनाही पाहता. लाच नावाच्या अभद्र अपत्याला तुमच्या सारख्या नतद्रष्ट वृत्तीच्या लोकांनी जन्माला घातलं. तुमच्या साम, दाम, दंड, भेदातील ‘दाम’ म्हणजेच आताची लाच होय. या तुमच्या लाचेपाईच तत्कालीन सरकारला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आणावा लागला. एसीबीची (ॲंटी करप्शन ब्यूरो) स्थापना करावी लागली. *’मेमटी घेतो चिमटा, जावून बसतो कोनटा, आग लागली देशात की, दुरून गंमत बघतो एकटा. (मेमटी म्हणजे मुकाट्याने/गुपचूप, कोनटा म्हणजे कोपरा) ही तुमची हमेशाची वृत्ती राहिलेली आहे. आश्रितांनो हीच तुमची षडयंत्रकारी नीच वृत्ती आहे. अंगाशी आले की, तात्पुरती दिलगिरी व्यक्त करायची, माफी मागायची ही तोंडदेखलेपणाची वृत्ती तुमच्यात ठासून भरली आहे. मामला रफातफा झाला की काही काळानंतर पुन्हा तेच उठ रे चंदा फिर वो ही धंदा करायचं.* आम्हाला संस्कृतीचे डोस पाजणारे तुम्ही पहिले तुमची संस्कृती (की विकृती) बघा काय लायकीची आहे?
छ. शिवरायांच्या अपमान केल्यानंतर अक्कलशुन्य राहूल सोलापूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी पुन्हा बेताल व अपमानजनक बोंबललाच. यामुळे आमच्या भावना पुन्हा बेहद दुखावल्या गेल्या. म्हणे डॉ आंबेडकर वेदांनुसार ब्राह्मण ठरतात. अरे बावा राहूला, ज्या डॉ. बाबासाहेबांनी आपल्या प्रचंड कुशाग्र बुद्धीने तुमच्या धर्मग्रंथांतील, वेदातील, स्मृतीतील, श्रृतीतील बाष्कळ विधानांची चिरफाड केली, तुमची मनुस्मृती तर जाहीरपणे त्यांनी जाळली होती. शिवाय तुमच्या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेशी उभ्या आयुष्याभर झगडत राहिले, संघर्ष करत राहिले ते तुमच्या वेदांनुसार ब्राह्मण कसे काय ठरू शकतात रे जावई शोध लावणाऱ्या? त्यांचा अस्सल भारतीय डीएनए तुमच्या अभद्र डीएनएशी कसे काय जुळवू पाहता रे? *कहाॅं राजा भोज और कहाॅं गंगूतेली?* असे अनेक तार्किक प्रश्न पुन्हा उभे राहतात. तुमच्यात जागतिक कीर्तीच्या व्यक्ती निपजल्या नाहीत (कधी निपजणारही नाहीत म्हणा) म्हणून तुम्ही लोक ठरवून ठराविक कालावधी नंतर वेळोवेळी *हिमाचलच्या उंचीचे असलेल्या आमच्या महापुरुषांची उंची त्यांची बदनामी करून खुजी करू पाहता.* ते तुम्हांला तुमच्या साता जन्मात शक्य होणार नाही हे लक्षात ठेवा. जी माणसे जेव्हा मर्यादेपलीकडे सामाजिक संघर्ष करतात, आपले सामाजिक उदिष्ट गाठण्यासाठी आपल्या संसाराची पर्वा न करता सहनशक्तीच्या पलिकडे जाऊन कष्ट उपसतात, सामाजिक समस्यांच्या भट्टीत तावून सुलाखून निघतात किंवा तुमच्या सारख्यांनी हेतूपुरस्सरपणे निर्माण केलेल्या भयानक समस्यांवर मात करून पुरून उरतात तेच पुढे अती उच्च शिखरावर जावून पुढे महापुरुष होतात. आपल्या महान कर्तृत्वाच्या तेजाने जगाचे डोळे दिपवून टाकतात व जागतिक कीर्तीचे धनी होतात. तुमच्या सारख्या कोत्या वातीचे लल्लू फल्लू कधीही तेवढ्या उंची पर्यंत पोहचू शकत नाहीत, पोहचू शकणार नाहीत. *ही कळ्या पत्थरवरची सफेद लकीर समजावी* तेव्हा निव्वळ वाह्यातपणा करू नका. थोडाश्या तरी लाजा, शरमा ठेवा. की त्याही बाजारात विकून खाल्ल्या? अरे राहुल सोलापूरकरा तू जे राजर्षी शाहू महाराजांच्या भूमिकेत कमावलं होतं ते आता सारं गमावलं रे! आणि वक्ता म्हणून तुझी लायकी आता तर पार शुन्य झाली आहे.
हे विदेशी आपल्या देशात आश्रित असलेले काही लोक विनाकारण काहीही खुसपट काढून किंवा अभद्र बोलून भारतातील शांतिप्रिय समाजात वेळोवेळी आगी लावण्याचा प्रयत्न करतात त्याशिवाय त्यांना शांत झोप लागत नाही की काय समजत नाही? किंवा त्यामागे त्यांची मानसिकता काय असू शकते? याची कारणेही पाहू.
१) आपल्या महापुरुषांची, महामातांची त्यांनी महाराष्ट्रात अपमान केला किंवा बदनामी केली तर ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता साऱ्या देशभर होते. पुढे ती जगात पसरते. वैज्ञानिक उपकरणाने मराठी भाषेचे कोणत्याही भाषेत भाषांतर होवून ती बदनामी जगाच्या कोणत्याही देशातील नागरिकां पर्यंत पोहचू शकते. व त्यामुळे जगभर आमच्या महापुरुषांची बदनामी होते. ती व्हावी उदा. जेम्स लेन प्रकरण. असा काही दळभद्री लोकांचा उद्देश असू शकतो.
२) महापुरुषांची बदनामी केल्यास देशाची शांतता भंग होवून देश अस्थिर होतो. त्यातून देश कमजोर होवून देशांतर्गत व जागतिक स्तरावरील कारभारात अनेक अडचणी निर्माण होवू शकतात आणि त्या व्हाव्यात अशी यांची ईच्छा असू शकते.
३) महापुरुषांची बदनामी केल्याने बहुजन तरूणांची माथी भडकवण्याचे षडयंत्र रचले जावून गरम रक्ताचे रूण पोरं भडकले तर ते आपल्या महापुरुषांच्या अस्मितेपायी कायदा हातात घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून त्यांच्यावर खटले भरले जातात. कोर्ट कचेरीच्या वाऱ्या सुरू होतात. त्यामुळे बहुजन पोरांचे शैक्षणिक नुकसान होते किंबहुना ते शैक्षणिक प्रवाहाच्या किंवा नौकरीच्या बाहेर फेकले जातात. त्यांच्या कुटुंबांचे अतोनात आर्थिक नुकसान होवून वेळेचा ही अपव्यय होवून त्यांचे हाल होतात. किंवा पद्धतशीरपणे त्यांचे खच्चीकरण करून हळूहळू बहुजन आपला वैचारिक विरोध करणे सोडून देतील हाही त्यांचा उद्देश असू शकतो.
४) भारतीय समाज समतेने व एकोप्याने शांततेत नांदला तर आपण त्यांच्या संख्येच्या तुलनेत नगण्य आहोत. त्यामुळे आपण एकटे पडू शकतो किंवा अघोषितपणे बहिष्कृत होवू शकतो अशी भीती त्यांना सातत्याने सतावत असते त्या भीतीपोटी सुद्धा ते अनैतिक कारवायात लिप्त असू शकतात.
५) म्हणून या ना त्या कारणाने बहुजनांना नेहमी विभाजित ठेवण्यातच आपली भृलाई व वर्चस्व अबाधित राहू शकते अशी यांची समजूत असू शकते
त्यात अजून काही इतर कारणांची भर पडू शकते. वर्चस्ववादी लोक आपले हितसंबंध जपण्यासाठी खूप दूरचा विचार करणारे असतात. उदा. जर त्यांना शंभर वर्षांनंतर आपल्या हिताची एखादी योजना राबवायची असल्यास त्यावर ते आजपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने व चिकाटीने काम करायला सुरुवात करतात. या त्यांच्या गुणांची आपल्यात मात्र वानवा आहे. पण फरक फक्त एवढा राहिल की ते या गुणांचा वापर अनैतिक कामासाठी करतात आपण नैतिक कामासाठी उपयोग करून घेवू शकतो. हे आपण मूलनिवासी भारतीयांनी कधीही विसरता कामा नये. अजून एक महत्त्वाची गोष्ट मूलनिवासी बहुजनानी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सावत्र मुलांना आपल्या सावत्र आई बद्दल कधीही प्रेम भावना नसते हा निसर्ग नियमाचा सिध्दांत आहे. हाच सिध्दांत विदेशी ब्राह्मणांनाही लागू पडतो. म्हणून त्यांच्या मनात भारताविषयी ईर्ष्या आहे व्देष आहे. हे त्यांच्या देश विरोधी कारवायातून दिसून येते. हा देश आपला नाही ही भावना किंवा सल त्यांच्या मनात सतत सलत असते. ते आपल्या देशात आल्यापासून त्यांच्या मनात भारता विषयी प्रेमभावना तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलेच आहे ब्राह्मण पुरोगामी असो की प्रतिगामी असो या एकाच शरीराच्या दोन भूजा आहेत. काही ब्राह्मण काळाच्या औषधाने भाारताच्या मूळ संस्कृतीशी आपला वर्चस्ववाद सोडून अगदी मनापासून एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतील तर ती स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. आपण बहुजन मोठ्या दिलाची माणसे आहेत. डॉ. बाबासाहेबांना कट्टर ब्राह्मणांनी अतोनात मानसिक त्रास देवूनही त्यांनी आपल्या संविधानात ब्राह्मणांना मोठ्या मनाने भारताचे नागरिक बनवले. हा डॉ बाबासाहेबांचा मोठेपणा सर्च ब्राह्मणांना आज नाही तर उद्या मान्य करावाच लागेल. याशिवाय त्यांच्या जवळ दुसरा पर्याय नाही. हे शाश्वत सत्य ब्राह्मणांना नाकारता येणार नाही.
– अशोक सवाई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत