महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करा. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचा मोर्चा…

आंबेडकरांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्यावर २७ मे १९३५ रोजी मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या स्थळावर रमाईंचे स्मारक उभारण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने करूनही हे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे रमाईंच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे यासह विविध मागण्यांसाठी स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे अडविला. मोर्चात शिळा सपकाळे, मालती माटे, सुमित्रा सुखदेवे, सुप्रिया मेश्राम, प्रगती पारसी, अंजना मेश्राम, वंदना निकोसे, कृष्णा बोरकर, ज्ञानदेव गजभिये, हरिदास बेलेकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चातील शिष्टमंडळाने पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांबाबत चर्चा करून संबंधित विभागाकडे मागण्या पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
या आहेत मागण्या
मुंबईतील परड येथील बीआयटी चाळ क्रमांक एक खोली क्रमांक ५० व ५१ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या खोल्याच्या ठिकाणी स्मारकाची तातडीने निर्मिती करावी.
दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नाव द्यावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण गेलेल्या दापोली येथील घराच्या
वास्तूचे जतन करण्यासाठी स्मारक घोषित करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित सर्व स्थळांचा विकास करावा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!