मुख्यपानशैक्षणिक

ऐन परिक्षाच्या तोंडावर विद्यार्थांची गुणवत्ता ढासळलीअधिक तास घेऊन सुद्धा विद्यार्थी चिंतेत जिल्हा शिक्षण विभागाचे चक्क दुर्लक्ष .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे नुकतीच पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या पालक मेळाव्यात विद्यार्थांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आभ्यासात आणी बोलण्यात निराशा जानवल्याचे दिसुन आले .परंतु ऐन परिक्षेच्या तोंडावर ही निराशा दिसुन आल्यामुळे शिक्षणा विभागातील अध्यापनावर आणी विद्यार्थावर पालकांनी नाराजी व्यक्त केली सर्व गोष्टीकडे शिक्षण विभागचे या शाळाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष दिसुन येत आहे .
गोष्टींचा अभ्यास करावा लागेल तरच अध्यापना यामध्ये सुधारणा होईल विद्यार्थांचा आभ्यासात ला हलगर्जी पणा हा कुठेतरी थांबायाला हवा यावर ही महत्व चर्चा करण्यात आली .
इयता १० वी चा प्रथमसत्र पेपर पालकाना दाखवुन यावर व्यापक चर्चा करण्यात आली आसून अधिक तास घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळते या गोष्टीला जबाबदार कोण पालका मध्ये सभ्रम होत आहे .
विद्यार्थी खुप मोठ्या चिंतेत आसल्याचे चित्र दिसत आहे ही चिंता दुर करण्यासाठी अधिक तास घेऊन विद्यार्थाना जो भाग समजत नाही तो भाग शांत पद्धतीने समजावुन सांगीतला पाहिजे आणी त्यांच्या कडुन करवून घेतला पाहिजे तरच विद्यार्थी चिंता मुक्त होईल .
कारण इंग्रजी गणित आणी विज्ञान भाग १ व भाग २ या विषयाला अनुसरून हा सिलॅबस पुर्ण जरी झाला आसेल तर तो परत रिपीट करावा जेने करून विद्यार्थांना समजेल अशा भाषेत सांगावा आजचे विद्यार्थी आभ्यासात खुप कच्चे आसल्याचे दिसुन आले . कारण ” शिक्षकांची गुणवत्ता ही विद्यार्थांच्या गुणवत्ते वरून कळते ” जिल्हा परिषदेच्या विद्यार्थांची ही परिस्थीती जर आसेल तर जिल्हा परिषदेची पट संख्या घसरणीला सुरवात होईल याला अपवाद कोण हा प्रश्न सर्वासमोर उभा राहील .
खरेतर जिल्हा प्रशासन शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतू शिक्षण विभागाचे या शाळांकडे लक्षच देत नसल्या मुळे हा प्रकार घडला आसावा एखादा अधिकारी आले आसतील ते येतात खुर्चीवर बसतात शिक्षकांचे टाचन बघतात आणी निघुन जातात तेच अधिकारी जाणीव पूर्वद शिक्षणाच्या बाबतीत सक्षम आसतील तर ही वेळ विद्यार्थांवर येतच नाही याला प्रशासन सुद्धा जबाबदार आहेत वर्षात किती वेळा शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी किती वेळेस शाळेला भेटी दिले आहेत आणी काय केले याबद्दल पालकात शंका निर्माण होते आहे. .
पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या सभापती कोंडाबाई शिवाजी गायकवाड ह्या होत्या
या वेळी पालक पत्रकार दादासाहेब बनसोडे , शिवाजी गायकवाड, सय्यद , सामाजिक कार्यकर्त्या . शाहेदाबी सय्यद अदिनी आपापले मनोगत व्यक्त केले यावेळी सह शिक्षिका निर्मला गावीत , लीलावती कौरव , महादेवी रणे मनिषा खारवे , यावेळी अनेक शिक्षक व पालक उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!