निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

लोकशाहीच्या नावाने शंखं

शंख हे बिजू जनता दलाचे चिन्ह आहे म्हणून लोकशाहीच्या नावाने शंखं..

मित्रो,लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपल्या देशात नुकताच पार पडला..

प्रथमदर्शनी मतदारांनी सर्व काही सुव्यवस्थित केले आहे;
प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिली आहे,न्याय दिला आहे आणि खऱ्या अर्थाने मतदारांचा विजय झाला आहे असे जरी वाटत असले तरी सत्य हे त्यापलिकडेच आहे..

पोस्टट्रुथच्या या काळात सत्य हे तुमच्या समोर मांडले जाते अनेकदा ते सजवून तुमच्या समोर सादर केले जाते.
फॅब्रिकेटेड ट्रूथ नावाचा एक नविनच प्रकार हल्ली रुढ झाला आहे.

आपल्याला जे दिसते-जाणवते-मनावर ठसते ते कुणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणतो त्यामागे एक मोठी व्यवस्था कार्यरत असते याची पुसटशी जाणीवही बहुसंख्य लोकांना नसते.

अश्या परिस्थितीत खोटारडे-नाटकी-पाताळयंत्री-हितसंबंधांची भलीमोठी साखळी निर्माण करणारे लोक स्वत:च्या अर्थशक्तीच्या बळावर सारी व्यवस्था काबिज करतात आणि एखाद्या चित्रपटाला शोधावा असा स्क्रिप्टेड सुखांत व्हावा अश्या पद्धतीचे वास्तव घडवून आणतात हे प्रत्येकानेच समजावून घेणे गरजेचे आहे.

या निवडणूकीत मला खऱ्या अर्थाने महत्वाचा आणि मनाला चटका लावून जाणारा निकाल जर कुठला वाटला असेल तर तो म्हणजे ‘ओरिसा’तील नवीन पटनायकांचे सत्तेतून पायउतार होणे.

बिजू जनता दलाने नवीन पटनायक यांच्या रुपाने तब्बल २४वर्षे ८५दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळले..

ओरिसाचे माजी मुख्यमंत्री यांचे नवीन हे चिरंजीव..

वयाच्या पन्नाशी पर्यंत राजकारणाशी कुठलाही संबंध नाही,
डून्स स्कूलमधले शिक्षण,अगदी संजय गांधी यांचे वर्गमित्र अमेरिकन जॅकलिन केनेडी,रॅाकस्टार मित जॅगर यांच्यासारखा मित्रपरिवार..

लिखाण-पर्यटन-संगीत-क्रिडा अशी सुविधासंपन्न जीवन सोडून २०००साली वडीलांच्या निधनानंतर त्यांनी ओरिसाला परतण्याचा निर्णय घेतला..

अगदी स्थानिक उडिया भाषाही न येणाऱ्या या माणसाने ओरिसाचे पालकत्व स्वीकारले,त्यांच्या या दोन तपांच्या कार्यकाळात काय झाले हे बघण्यासारखे आहे.
▪️इथले ७०%लोक २००० सालापर्यंत दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत होते आज फक्त त्यातले फक्त १०% लोक
दारिद्र्यरेषेखाली आहेत..
▪️एका आदिवासी मागास राज्याचे रुपांतर त्यांनी एका आघाडीच्या राज्यात केला आहे.दरडोई उत्पन्न तब्बल बारा पटिने वाढले,राज्याचा विकासदर हा प्रचंड वाढला,नोकऱ्या वाढल्या.
▪️२००० कोटीचे कर्ज डोक्यावर असणारे राज्य ४३,४७१कोटी शिलकीत गेलं..
▪️जिथे देशाचा कर्ज जीडीपी अनुपात ५७%आहे तिथे ओरिसाचा देशातील सर्वात कमी अर्थात फक्त १३%आहे..
▪️सिंचन व्यवस्थेत तब्बल १९करोड एकरने वाढ झाली आहे. ▪️अन्नधान्याच्या उत्पादनाने एक लाख टनावरून ५४लाख टन इतकी मोठी उडी मारली आहे.
▪️देशात आघाडीचे खनिज उत्पादक राज्य म्हणून ओरिसाची ओळख तयार झाली आहे.
▪️गेल्या २४वर्षात इथे तब्बल २१हजार सरकारी शाळा आणि २२शासकिय विद्यापीठे उघडली आहेत.
▪️९०%जनता ही सरकारी आरोग्य योजन म्हणजे ‘बिजू स्वास्थ्य योजनेचा’ लाभ घेते.
▪️इथला मृत्यूदर घटला,बालमृत्यू कमी झाले,बेरोजगारी-गरीबी कमी झाली.
▪️भारतीय हॅाकी पुनर्जीवित करण्याचे श्रेयही नवीन पटनायकांचेच..
▪️फादर स्टेनला त्याच्या दोन लहान मुलांसह जिवंत जाळणाऱ्या बदनाम धर्मवेड्या जातीयवादी ओरिसाचे रुपांतर मोठ्या कष्टाने प्रगतीशील राज्यात केले.

या संदर्भातले सारे आकडे-तथ्ये जगजाहिर आहेत,ओरिसातील प्रत्येकाला माहित आहेत,किंबहुना सगळ्यांनीच ते प्रत्यक्ष अनुभवले आहे असे असतांनाही तब्बल पाच वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नवीन पटनायक का हरले? हा खरा प्रश्न आहे.

नवीन पटनायक अविवाहित आहेत,वडिलांच्या प्रशस्त बंगल्याच्या आवारातील आऊटहाऊसमध्ये ते अतिशय साधेपणाने रहातात.

कुर्ता-पायजमा-चप्पल यापलिकडे त्यांच्या गरजा नाहीत असे असतांना एका मोठ्या प्रपोगंडाचे ते शिकार झालेत..
शिकलेले-जग बघितलेले पटनायक यांची पहिली पसंत अर्थातच चांगले प्रशासकिय अधिकारी होते.

राजकिय महत्वाकांक्षी बांडगुळांना त्यांनी दुय्यम स्थानावर ठेवले होते त्यामुळे राजकिय दलालांना त्रास होणे सहाजिकच होते.

कार्तिक पंडियन नामक एक तमिळ आयएएस अधिकारी हे त्यांचे गतकाळातील निकटवर्तीय होते. पंडियन यांची पत्नी सुजाता ही देखील आयएएस..

स्वत:च्या गरजा संपलेली ही लोकं जेव्हा समाजासाठी जीव तोडून काहीतरी करू इच्छितात तेव्हा ते अर्थातच स्वच्छ मार्गाची अपेक्षा करतात आणि इतरांकडूनही तसाच आग्रह ठेवतात अश्या माणसांची बदनामी करणे सोपे असते..

प्रपोगंडा या विषयाचा तर खाजप हा तज्ज्ञ आहे मग त्यांनी नवीन पटनायक हे सदर आयएएस दाम्पत्याचे बंधक आहेत,मुळचे तमिळ पंडियन हे इथे उपरे आहेत तेच सुपरसीएम आहेत असे नानाविध आरोप झाले आणि कालपर्यंत नमोंचे केंद्रातील साथीदार पटनायक यांच्यात विरोधात स्वार्थ समोर दिसतात त्यांनी मोर्चा खोलला..

अगदी सीट शेअरींगपर्यंत गेलेली चर्चा राज्याच्या सत्ताकारणावरून फिस्कटली आणि जसे महाराष्ट्रात सेनेसोबत झाले तसेच ओरिसात पटनायकांसोबत झाले..

पुढची गोष्ट ही सर्वत्र सारखीच आहे.राजस्थात गेहलोत,एमपीत कमलनाथ,छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल,महाराष्ट्रात उद्धव ठाकरे,
कर्नाटक-गोवा-मणीपूर-आसाम या सर्व ठिकाणांची स्क्रीप्ट-ॲक्शन-डिरेक्शन सगळं सेम टू सेम..

वाईट फक्त एवढंच वाटतं या सगळ्या स्वार्थी राजकारणात चांगूलपणाचा जीव जातो.

सरतेशेवटी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने नवीन बाबूस ठेच चंद्राबाबू-नितिशबाबू शहाणे ठरावेत एवढीच अपेक्षा !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!