महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

समता प्रवाह समृद्ध केव्हा होणार.

पशु नारी शुद्र सब है ताडणके अधिकारी तुलसीदास
वर्ण व्यवस्थेतील शुद्र नारी पशु समान प्रताळीत करणारे आहेत.मनु म्हणतो की एखाद्या ब्राम्हणानी शुद्र स्त्रिया सोबत संभोग केला तर त्याला शारिरीक ईजा नकरता थोडा दंड करावा परंतु शुद्रानी ब्राह्मण स्त्रिया सोबत संभोग केला तर त्याचे लिंग कापावे अशी कठोर शिक्षा सांगितली आहे.एकच अपराध परंतु शिक्षा वेगळी वेगळी दिली जाते.सर्व जाती समुहांनी ब्राह्मण जातीला उच्च मानून त्यांची सेवा करावी असा आदेश मनुनी दिला आहे.ही विषम व्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांना हिन्दु या नावानी संबोधून एका सूत्रात बांधुन कार्यरत केले जाते.जाती कायम ठेऊन उच्च निच अशी उतरंड असून त्याची जपणुक करावी असा आदेश असतो.हयाविरूद्ध कोणीही बंड करू नये म्हणून देव धर्माचा आधार घेतला जातो.भजन किर्तन पूजा पाठ यात गुंतवून ते व्यवस्था सोडून जाणार नाही याचा प्रती बंध केला जातो.
महात्मा ज्योतिराव फुले यानी आपले संपूर्ण आयुष्य चदनासारखे झिजवून ह्या व्यवस्थे विरुद्ध चेतवण्याचा प्रयत्न केला.शिक्षण घेऊन साक्षर करण्यासाठी शाळा सुरू केल्या.सर्व जातीच्या स्त्रियांना शिक्षण दिले.सावित्रीबाई फुले यानी शेण माती दगडाचा मारा सहन करुन शिक्षणाचे कार्य अविरत चालू ठेवले सर्वांना शिक्षणाचे दार खुले केले.महात्मा ज्योतिराव फुले यानी लेखनीद्वारा जन जागृतीची मोहीम सुरू केली.गुलामी विरूद्ध बंड करून समतावादी व्यवस्थेकडे चालण्यास प्रवृत्त केले.जन जागृतीची मशाल पेटवून अंधारात जगणारा बहुजन समाजाला उजेड दाखवून मानसात बधुतवाचे नाते निर्माण केले.सत्यशोधक समाजाची निर्मिती करुन प्रस्थापित व्यवस्थेला हादरा दिला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानी विषम व्यवस्थे विरूद्ध रणशिंग फुंकले.व्यवस्थेची चिरफाड करून शवचिकित्सा केली.शेतकरी मजूर मिल कामगार याना संघटित करून अन्यायाविरुद्ध लढण्याची मानसिकता तयार केली.भाडवलशाही सावकारशाही विषमसमाज व्यवस्थेला हादरा दिला.जाती नष्ट करण्याचे आदोलन करून समतावादी सर्व समान कोणी उच नाही कोणी निच नाही.सर्वाना समान शिक्षण समान संधी उपलब्ध करून दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना राज्य घटना लिहण्याची संधी मिळाली तर त्यांनी कलम३४० घालून ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आयोग नेमण्याची व्यवस्था केली.त्यामुळे काका कालेरकर आयोग नेमण्यात आले.परतु ह्या आयोगाच्या शिफारशी अमलात आल्या नाही.१९७७ला मंडल आयोग स्थापन करून मंडल यानी संपूर्ण देशात फिरून ओबीसी समाजाची यादी तयार केली.शिफारस केली.आयोगाचा अहवाल १९८०ला संसदेला सादर केला जनता पक्षाचे सरकार व त्यानंतर आलेले काँग्रेस पक्षाचे सरकार
आयोगाच्या शिफारसी थंड बस्त्यात ठेवले. त्यासाठी आबेडकरीचळवळीने पुढाकार घेऊन जनचेतना निर्माण केली आरक्षणवादी लोकाना सोबत घेऊन ओबीसीना आरक्षणमिळावे ह्यासाठी आदोलन तीव्र केले.१९९०ला वि पी सिगाचे सरकार आले तेव्हा त्यांनी मंडल आयोग लागू केला.मडल विरूद्ध कमंडल यात्रा काढण्यात आली.त्यात मोठ्या प्रमाणात ओबिसी समाज सामील झाला.वबाबरी मजिद पाडण्यास साह्यभूतठरला भाजपनी वीपी सरकारचा पाठींबा काढून घेतला व मडल आयोग लागू करणार्याचे सरकार कोसळले.
काँग्रेस व भाजप यानी मडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास कोणतीही भूमिका घेतली नाही तरी ओबीसी समाज काँग्रेस वभाजप सोबत मोठ्या प्रमाणात आहे.सास्कृतिकदृषटया ओबीसी समाज ब्राह्मणी व्यवस्थे सोबत जुळला आहे ‌त्यामूळे ही व्यवस्था मजबूत होत आहे.ज्यादिवसी ओबीसी समाज जागृत होऊन ब्राम्हणी व्यवस्थेला ओळखून दंड थोपटून विरोधात लढण्यास तयार होईल . त्या वेळी समता प्रवाह समृद्ध होईल.

विनायकराव जामगडे ९३७२४५६३८९
७८२३०९३५५६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!