देशात काल ११६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

काल दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर २९३ रुग्ण बरे झाले आहेत. देशात काल ११६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. ४ हजार १७० कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही काल कोरोनाचे एकूण २८ रुग्ण आढळून आले.१३ रुग्ण बरे झाले आहेत. .कोरोनाविषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे.आवश्यकतेनुसार मास्क वापरा,वारंवार हात साबणानं धुवा, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर असावं, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा आणि चुकीची माहिती इतरांना देऊ नका तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. योग्य खबरदारी घेतली तर घाबरण्यासारखं काहीच नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत