
तुमचे कर्ज माफ झाल्यानंतर तुम्हाला ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्रही दिले जाईल अशी जाहीरात तुम्ही कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर पाहिली आहे असेल . असं असेल तर तुम्ही अधिक सावध होण्याची गरज आहे. तसेच देशातल्या कोणत्याही निवडणुकीपूर्वी लोकांमध्ये कर्जाची परतफेड न करण्याचा ट्रेंड दिसून आला आहे, या सर्व गोष्टींबाबत आरबीआयने (RBI) कडक इशारा दिला आहे.
प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कर्जमाफीबाबत लोकांची फसवणूक होत असल्याचे आरबीआयला आढळून आले आहे. त्यामुळे लोक कर्जाचा ईएमआय भरत नाहीत. हे लक्षात घेऊन आरबीआयने लोकांना याबाबत सावध केले आहे. यासाठी तुम्हाला नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
बँका कर्जवसुली स्वतः करून घेते . कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या अशा सर्व जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसेच ते तुम्हाला कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊ शकत नाहीत. याचे कारण म्हणजे सर्व बँका कर्जवसुली स्वतः करतात. त्यासाठी ते वसुली एजन्सी नेमतात. त्याचवेळी आरबीआयने कर्ज वसुलीच्या पद्धतींबाबत तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. त्यामध्ये कर्ज वसुलीसाठी धमकी देण्यावर बंदी घालणे, योग्य वेळेच्या मर्यादेत कॉल करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत