
दुसऱ्या सामन्यात रीझा हेंड्रिक्सने शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला शानदार विजय मिळवून दिला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. 12 December 2023: पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची साथ दिली आणि टीम इंडियाचा पाच गडी राखून पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकात १८० धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकात १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. पाऊस पडल्याने मैदान आधीच ओलसर झाले होते. त्यामुळे गोलंदाजांना कुठलीही मदत मिळाली नाही. चेंडू सतत ओला होत होता. ना स्विंग ना स्पिन होता तरीही, टीम इंडियाने चांगली लढत दिली. भारताची ही झुंज अखेर अपयशी ठरली आणि पावसाने टीम इंडियाचा पराभव केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१२ डिसेंबर) खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने गबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया पुढे खेळू शकली नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी १३.५ षटकात १५४ धावा करत सामना जिंकला. यासह त्याने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. तिसरा आणि अंतिम सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल. तिसरा आणि अंतिम सामना जोहान्सबर्ग येथे गुरुवारी होणार आहे. टीम इंडियाने तो सामना जिंकला तर मालिका बरोबरीत येईल. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेची नजर मालिका २-०ने जिंकण्यावर असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत