महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास फडणवीस यांचा विरोध

  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. यामुळे अजित पवार यांची कोंडी झाल्याचे मानले जात असताना त्यांच्या गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

‘ईडी’ने मलिक यांना अटक केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले. अजित पवार महायुतीत येताच काही दिवसांनी मलिक यांना जामीन मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, गुरूवारी मलिक विधान भवनात येताच अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले. सभागृहातही ते सत्ताधारी बाकांवर बसले होते. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस यांना डिवचले. त्यावर देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर मलिक जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढले नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. दुसरीकडे त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवले व मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे कळविले. हे पत्र लगोलग प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात आल्याने पवार गटातून नाराजी व्यक्त झाली. फडणवीस अजितदादांना हे खासगीत सांगू शकले असते, असा सूर पवार गटाच्या काही नेत्यांनी लावला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसममध्ये घडलेल्या घडामोडींशी मलिक यांचा कुठलाही संबंध नसल्याची सावध प्रतिक्रिया

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!