आर्थिकउद्योगमहाराष्ट्रमुख्यपान

ऊसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी!

महाराष्ट्रात कमी पाणी असल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात 8% घसरण झाल्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी 337 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारत सरकारने मोठी घोषणा केली आहे. उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. भारतात कमी पावसामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. इथेनॉलचे उत्पादन सुरू राहिल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 2023-24 मध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात 2024-25 ची शेती अजून सुरू झालेली नाही.

भारत सरकार साखरेपासून इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येऊ लागल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भावी दर सुमारे 8 टक्क्यांनी घसरले. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बलराम चिनी 6.60 टक्के, दालमिया भारत 6.08 टक्के, बजाज हिंदुस्थान 5.41 टक्के, डीसीएम श्रीराम 5.80 टक्के घसरणीसह बंद झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साखर महागण्याची भीती आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात साखरेच्या पुरेशा उपलब्धतेवर सरकारचे लक्ष आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने गेल्या महिन्यात सांगितले की 2023/24 वर्षात साखर उत्पादन 8 टक्क्यांनी घसरून 33.7 दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!