छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर टीका

लोकशाही मार्गाने उत्तर देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, मनोज जरांगे रोज माझ्याबद्दल काही तरी बोलत असतात. मी काही बोललो की, लोक माझ्याविरोधात तुटून पडतात. राज्यातील वातावरण छगन भुजबळ आणि मनोज जरांगे बिघडवत असल्याचा आरोप होतो; पण तो रोज बोलतो, मी ‘पंधरा दिवसांतून एकदा उत्तर देतो. असे स्पष्ट मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मी बेकायदा पिस्तूल घेऊन गुंडांना बरोबर घेऊन फिरत नाही, की जाळपोळही करत नाही. ज्या गुंडांनी जाळपोळ केली त्यांना सोडा म्हणूनही सांगत नाही, असे सांगत भुजबळ म्हणाले, जरांगे हे काही महाराष्ट्राचे नेते झाले नाहीत, की सगळ्यांना आदेश देतील. त्यांना माझं सांगणं आहे की, जरा अभ्यास करा. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहेच, त्याचबरोबर सर्व पक्षांचीही आहे. याबद्दल इतरांनीही व्यक्त व्हायला हवे, असे भुजबळ म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत