मार्च मध्ये होणार लोकसभा निवडणुका ?

विधानसभा निवडणुकीत तीन राज्ये सहजगत्या जिंकल्यानतर आता भाजपने केंद्रातील सत्तेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी लोकसभा निवडणुका मार्चमध्ये घेण्याची तयारी चालविल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते. अयोध्येतील राममंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर होणाऱ्या छोटेखानी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदान मंजूर केले जाईल. त्यानंतर लगेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाऊ शकते.
लवकर होणाऱ्या निवडणुकांसाठी खासदारांकडे केवळ ६० दिवसांचा कालावधी राहू शकतो. त्यामुळे त्यांनी आपापल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना भाजपने दिल्या आहेत. सोबतच एनडीएतील घटक पक्षांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले
आहे. तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशानंतर विजयाच्या लाटेत सातत्य राखण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुका काही आठवडे अलीकडे घेण्याची आखणी सुरू असल्याचे कळते.
विरोधकांच्या गोंधळाचा फायदा घेणार
विधानसभा निवडणुकांमधील दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील नेत्यांचा आणि कार्यकत्याँचा उत्साह मावळला आहे; तर विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्येही गोंधळाचे वातावरण असून लोकसभेसाठी जागा वाटप, भाजपविरुद्ध एकास एक उमेदवार देण्याचा प्रस्ताव यांसारख्या गोष्टी हवेतच आहेत. याच परिस्थितीत भाजपला जास्तीत जास्त यश मिळण्याची संधी असल्याचेही भाजप धुरिणांचे म्हणणे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत