सम्यक बोधीवन ट्रस्ट- भारतीय बौद्ध महासभास्थापनेतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर””””””””””””””””””””””

बंधूनो- प्रत्यक्ष परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन करतांना हीच भूमिका घेतलेली होती. *बेंगलोरला बौद्ध सेमिनरी स्थापन करून तेथे संघ घडविण्याचे आणि संघाच्या अधिपत्याखाली गृहस्थ धम्मप्रचारकही घडविण्याचे कार्य अंगिकारले होते आणि कार्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सुसंघटीत सामर्थ्याचाहातभार लावायचा होता. यासाठी ही उपासकांची संघटना स्थापन करून धम्म कार्यासाठी आपल्या उत्पान्नाचा विसावा भाग देण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले होते. धम्म प्रचाराच्या कार्याचे त्यांचे नियोजन अशा प्रकारचे होते. आपण भारतीय बौद्ध महासभेच्या ध्येय उद्दिष्टांकडे नजर टाकली तरी हे सत्य लक्षात आल्यावाचून राहत नाही. भविष्यकालीन धम्मप्रचाराच्या त्यांच्या संकल्पनेच्या कसोटीला उतरणारा कोणीही देशी किंवा विदेशी भिक्खू तेव्हा अस्तित्वात नव्हता. म्हणून त्यांनी कोणत्याही भिक्खू ला ते काम न सोपविता ब्राह्मदेशातील भिक्खू संघाला बौद्ध सेमिनरीचे संचालन करण्याची जबाबदारी दिली होती. भारतीय बौद्ध महासभेच्या उद्दिष्टात म्हटले आहे की:
1. भारतात बुध्द धम्माच्या प्रसाराला हातभार लावणे.
2. बौद्ध जीवनपद्धतीच्या पूजेसाठी विहारे निर्माण करणे.
3. धार्मिक व वैज्ञानिक विषयांचे शिक्षण देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये स्थापन करणे.
4. अनाथालये, दवाखाने आणि मदतीची केंद्रे चालवणे.
5. बुध्द धम्माच्या प्रसारासाठी प्रचारकांना प्रशिक्षण देणा-या बौद्ध सेमिनरी सुरू करणे.
6. सर्व धर्माच्या तौलनिक अभ्यासला हातभार लावणे.
7. बौद्ध वाडमयाच्या प्रकाशनाचे कार्य हाती घेणे आणि सर्वसामान्य जनतेला बुध्द धम्माचे अचूक आकलन होण्यासाठी पात्र आणि पत्रिका प्रसृत करणे.
8. जर गरज पडली, तर भिक्खूंचा नवा संघ स्थापन करणे.
9. प्रकाशनाचे कार्य करण्यासाठी मुद्रणालय किंवा मुद्रणालये चालविणे.
10. सामूहिक कार्यासाठी आणि बंधूभाव जोपासण्यासाठी भारतीय बौद्धांचे मेळावे आणि परिषदा भरविणे.या उद्दिष्टांच्या शब्दरचनेकडे नीट पाहिल्यास आपणास दिसून येते की, भारतात बुध्द धम्माच्या प्रसाराला हातभार लावणे हा भारतीय बौद्ध महासभेचा पहिला उद्देश आहे. परंतु लोक मात्र भारतीय बौद्ध महासभेला बुध्द धम्माचा प्रचार करणारी संस्था मानतात. *To Promote* या इंग्लिश शब्दाचा अर्थ आहे हातभार लावणे त्याचा अर्थ ‘करणे’ असा कोणी आणि का केला हे कोणालाही माहीत नाही. या मूलभूत गैरसमजामुळे भारतीय बौद्ध महासभा मूळ उद्दिष्टांपासून भरकटत गेली. धम्म प्रचार करणे हे तिचे मुळी कार्यक्षेत्रच नव्हते. नको ते कार्य बळेच अंगावर घेतल्याने आणि ते पार पाडण्याची कोणतीही योग्यता नसल्यामुळे भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांच्या कार्याला मुळीच न्याय देऊ शकली नाही. त्यामुळे अवघा बौद्ध बनलेला तेव्हाचा समाज तसेच नंतरचाही समाज ख-या धम्म संस्कारापासून वंचित राहिला. उपासक वर्ग धम्म प्रचारास पुरेसा सक्षम नसतो. हे बाबासाहेब जसे स्पष्टपणे जाणून होते. ती जान नंतरच्या आंबेडकरी अनुयायात मुळीच नव्हती. कारण सर्वजण नव्यानेच बौद्ध बनले होते, प्रशिक्षित भिक्खू- भिक्खूनी संघ घडला पाहिजे ही बाबासाहेबांची तळमळ होती. त्याच बरोबर उपासकवर्गही प्रशिक्षित झाला पाहिजे आणि संघाच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक स्थरावर त्याने काम केले पाहिजे, असा त्यांचा विचार होता. म्हणून बौद्ध सेमिनरी हे त्यांच्या धम्म कार्यातील सर्वश्रेष्ठ महत्वाचे अंग होते. ते त्यांनी पाचव्या उद्दिष्टात नोंदले आहे. त्या कार्यास सगळीकडून हातभार लावणे ही त्यांची तळमळ होती. म्हणून त्यांनी उपासकवर्गाची संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचे हे पहिलेच उद्दिष्ट ठरविले आहे. परंतु हे सत्य समजणे बाबासाहेबांच्या नंतर कोणालाही शक्य झाले नाही, ही वस्तुस्थिती आज कबूल करण्याशिवाय काही गत्यंतर नाही .भदंत विमलकित्ती गुणसिरी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत