महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

“अजित पवार यांनी निवडणूक का लढवली नाही”   वकील देवदत्त कामत यांनी केला प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कोणाचा, या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांच्या वतीने युक्तिवाद केला जात आहे. शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी, अजित पवार यांची पक्षाध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील गट सामील झाल्यानंतर, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपणच पक्षाध्यक्ष असल्याची घोषणा केली व मूळ राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यासंदर्भात अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. शरद पवार गटाच्या वतीने पुढील सोमवारी युक्तिवाद केला जाणार असून त्यावर मंगळवारी अजित पवार गटाच्या वतीने म्हणणे मांडले जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील सप्टेंबरमध्ये झालेल्या कार्यकारिणी बैठकीमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती बेकायदा असेल तर त्याविरोधात अजित पवार यांनी दाद का मागितली नाही, असा मुद्दाही देवदत्त कामत यांनी उपस्थित केला. पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर पक्षाच्या गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील कुठल्याही पदाधिकाऱ्याने तक्रार केलेली नाही. इतकेच नव्हे उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून अजित पवारांनी स्वाक्षरी केली होती. मग, शरद पवारांची नियुक्ती चुकीची कशी, असा युक्तिवाद वकील देवदत्त कामत यांनी केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!