भारतीयसंविधान हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक – भीमराव गाडे

आटपाडी
२२/११/२०२३
फुले शाहू आंबेडकर विचार मंच आटपाडी यांच्या वतीने संविधान जनजागृती सप्ताह तिसरे पुष्प ज्येष्ठ अभ्यासक भिमराव गाडी यांनी गुंभले
राज्यघटना निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान जास्त असल्यामुळे त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते जुन्या चाली रीती रूढी परंपरा नष्ट करण्याचे काम भारतीय संविधानाने केले. मनुस्मृतीचा प्रभाव तत्कालीन समाजावर होता तो प्रभाव भारतीय संविधानाने कमी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे अर्थतज्ञ होते. समाजशास्त्राचे गाडी अभ्यासक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते समाज रचनेची व्यवस्था जोपर्यंत नागरिकांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत जातीभेत संपुष्टात येणार नाही. असे मत गाडे यांनी स्पष्ट केले.
पुढे म्हणाले सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिक जाती-जातीमध्ये विभागला असेल, सर्वात मोठ्या लोकशाहीचे जनक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आदरणीय घेतले जाते सामाजिक रचनेचे विविध पैलू समजत नाहीत तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. सामाजिक विषमता नष्ट होत नाही तोपर्यंत प्रजासत्ताक भारत म्हणता येणार नाही चतुर वर्ण व्यवस्थेने प्रत्येक नागरिकाचा घात केला. समाजातील मागासलेल्या व्यक्तीला न्याय देण्याचे काम भारतीय संविधानाने केले. भारतीय संविधान हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या मताचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिक महत्त्व आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला. आरक्षणाची प्रतिक्रिया ही सदस्य पूर्ण होणार नाही. असे भीमराव गाडे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले शिवाजी लिंगरे सर यांनी विचारवंताचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांचे कौतुक केले व म्हणाले विचार मंचाचा कार्यक्रम नियोजनबद्ध व आदर्श घेण्यासारखा आहे. कारण कोणताही कार्यक्रम सातत्याने चालू ठेवणे हे खूप मोठे काम आहे. ते काम आटपाडी सारख्या ग्रामीण भागात राजेंद्र खरात यांच्या टीमने सातत्याने नववर्ष सुरू ठेवले आहे. असे म्हणत पुढील कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
स्वागत अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी मागील आठ वर्षाच्या सर्वांगीण आढावा घेऊन सात दिवसातील विविध विषयावर आपली भूमिका मांडली.
दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व संविधान प्रस्ताविका घेऊन करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर विचार विचार मंच अध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांच्या हस्ते सर्व प्रमुख मान्यवरांचा संविधान प्रत व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन सुरेश मोटे सर यांनी केले व आभार प्रतिभा विवेक सावंत यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी श्याम ऐवळे सर, रसिक सपाटे सर, संजय कबीर सर, समाधान ऐवळे सर, सतीश करडे सर किरण सोहनी सर,दीपक कबीर सर, श्रीकांत कुंभार सर, नितीन गळवे सर,
सुस्मिता मोटे, प्रतिभा सावंत, कविता खरात,पुनम ऐवळे सुनील तोरणे, सनी पाटील सर, संताजी देशमुख, रणजित ऐवळे, विशाल काटे, विकास मोटे, रविंद्र माने, विशाल तिरमारे,अविराज काळेबाग, निलेश गवाळे, आदित्य सातपुते मारुती, ढोबळे, नितीन तोरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत