महाराष्ट्रमुख्यपान
शासन आपल्या दारी’मुळे खोळंबली एसटीची वारी; प्रवाशांचे हाल.

आज भंडाऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी होत आहे. त्यासाठी गावोगावच्या लोकांना आणण्यासाठी एसटी बस आरक्षित करण्यात आल्याने ग्रामीण व शहरी भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे. भंडारा बस स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून आगारप्रमुखांनी प्रवाशांना याबाबत पूर्वसूचना देण्याची किंवा बसस्थानकांवर तसे फलक लावण्याची तसदी घेतली नाही. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत