
रविवारी अंतिम सामन्यात टीम इंडियाला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार सुरुवात केली होती. प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावला. अपवाद फक्त फायनलचा. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंगलं. देशभरातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनलचा सामना झाला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 विकेटने हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे आज प्रत्येक क्रिकेटप्रेमी निराश आहे. पण मॅचनंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी एक लाजिरवाणी कृती केली.
टीम इंडियाने फक्त 240 धावा केल्या. भारतीय फलंदाज चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयशी ठरले. त्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली. ऑस्ट्रेलियाने फक्त 4 विकेट गमावून आरामात विजयी लक्ष्य गाठलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत