क्रिकेटभारतमहाराष्ट्रमुख्यपान

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँडवर १६० धावांनी विजय

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं नेदरलँडचा १६० धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघ सलग नऊ विजय मिळवत स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे.काल भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित ५० षटकांत चार बाद ४१० धावा केल्या. राहुलनं ६४ चेंडूत १०२ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा ६१, तर विराट कोहली आणि शुभमन गिल प्रत्येकी ५१ धावांवर बाद झाले. श्रेयस १२८ तर सूर्यकुमार यादव दोन धावांवर नाबाद राहिले.या आव्हानाचा पाठलाग करणारा नेदरलँडचा संघ ४८व्या षटकात २५० धावांवर सर्वबाद झाला. जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं प्रत्येकी एक गडी बाद केला. श्रेयस अय्यर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत परवा मुंबईत भारताचा सामना न्यूझीलंडसोबत तर गुरुवारी कोलकात्यात ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!