डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक लेण्यावरती समता सैनिक दलांचे संचलन व मानवंदना..


धाराशिव: रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धाराशिव (दक्षिण) च्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केलेल्या “बौध्द समाजाने माघ अमावस्येला प्रत्येक बुद्ध लेण्यांवर दलाची मानवंदना व बौध्द कार्यक्रम करावे” या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव लेणी येथे जिल्ह्याचे अध्यक्षा विजयमाला धावारे, जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्षा राजश्री कदम, महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, पर्यटन विभागाचे प्रमुख विश्वासभाऊ पांडागळे, जिल्हा संघटक मीनाताई लगाडे, सुकेषण ढेपे, संस्कार प्रमुख कुमार ढेपे, हिशोब तपासनीस देविदास कदम, संरक्षण विभागाचे प्रमुख अनिल सरतापे व सैनिक दल, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे, तालुका संघटक अंजनाताई गजधने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच जिल्ह्यातील समता सैनिक दलाच्या वतीने लेण्यावरती मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशातील बुध्द लेण्या सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असताना अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. आता बौध्द समाज जागृत झाला असून समाजाने नियमितपणे बुध्द लेण्यावर जाऊन आपली ऐतिहासिक धरोहर टिकविणे व त्या अतिक्रमण पासून वाचवाव्यात. हे कार्य प्रत्येक बौद्ध नागरिकांनी केले पाहिजे. आपण सातत्याने जागृत असले पाहिजे आणि आपला ऐतिहासिक ठेवा सुरक्षित ठेवला पाहिजे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका तसेच बौद्धाचार्य, माजी श्रामनेर समता सैनिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सरणत गाथा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत