प्रेम आणि हिंसा भाग – ४ . अशोक सवाई.

स्त्रियांवर पुरुषाच्या अहंकारातून आलेला वर्चस्ववाद गाजवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आला/होत आहे. त्या अहंकारापायी पुरुषाने प्रेयसी, पत्नी, आई, आजी, बहिण अशा जवळच्या सर्वच नात्यातील महिलांच्या हत्या केल्या आहेत. असे असंख्य उदाहरणे कुठे ना कुठे बातम्यांच्या स्वरूपात समोर येत असतात. एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा झोडतो दुसरीकडे अशा दुर्दैवी घटना घडतात. आज जग अंत्यांतीक आधुनिक युगाकडे वाटचाल करीत असताना भारतात भारतीय समाजची वाटचाल मात्र दिवसेंदिवस पुरातन युगाकडे होत चाललेली दिसत आहे. हे देशासाठी अत्यंत दुर्दैवी आणि घातक आहे. देशात कुठे ना कुठे मुलींचे अपहरण होवून त्यांना गायबच केले जाते. गुजरात मध्ये ४०,००० मुली गायब झाल्याच्या बातम्या आहेत. बरं हे फक्त गुजरातेतच नाही तर देशाच्या प्रत्येक भागात कमी अधिक प्रमाणात अशा घटना घडत आहेत. बरं या बेपत्ता झालेल्या मुली कुठे जातात, कुठे राहतात किंवा समाज कंठकांनी मुलींचे केलेल्या अपहरणांच्या मुलींचे पुढे काय होते. याची माहिती शासन/प्रशासनाजवळ नाही तशी यंत्रणाही शासनाजवळ नाही. मुलींचे/महिलांचे जीवन अगदी पशूपेक्षाही कमी किमतीचे झाले आहे असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. भारतामध्ये एक तर मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी आहे. काही भागात तर १००० मुलांमागे फक्त ८०१ असा मुलींचा जन्मदर आहे. यामुळे लग्नासाठी मुलांना मुली मिळणे मुश्किल होवून बसले. त्यात असे मुलींचे भरपूर प्रमाणात बेपत्ता होणे. हा नुसता चिंतेचा विषय नसून अतिशय गंभीर विषय आहे. विद्यमान सरकारला जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. किंबहुना ते आपलं गाप्टं भरण्यापलीकडे काही करतच नाही. या पुरुषप्रधान देशात महिलांना दासी, गुलाम समजले जाते. तेथे मुलींच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकार लक्ष देईल याची सुतराम शक्यता नाही. बरं निदान महिला आयोगाने तरी मुलींचा प्रश्न ऐरणीवर घ्यावा तर महिला आयोगही सरकारच्या दावणीला बांधले गेले. आजपर्यंत मंत्र्यासंत्र्यांच्या, आमदार, खासदार, यांच्या मुलींचे कधी अपहरण झाले काय? (तसे होवू ही नये) ज्या मुली बेपत्ता झाल्या त्या बहुजनांच्या सामान्य घरातील मुली आहेत. ज्या आपल्या भविष्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी दूर घराबाहेर जातात. आणि बेपत्ता होतात किंवा समाज कंठक त्यांची हत्या घडवून आणतात किंवा काही त्याचे अपहरण करतात. मायबाप मात्र आपल्या पोटच्या गोळ्याला गमावून बसतात. फार भयानक अवस्था आहे. ज्या देशात मुली व महिलांची अशी दुर्दशा होत असेल तर तो देश खरच विश्वगुरू बननाच्या लायकीचा आहे? ज्या देशातील सरकार आपल्या जनतेसोबत दुर्व्यवहार करते तेथील जनता त्या सरकार विरुद्ध उठाव करून त्या हुकुमशहा सरकारला चितपट करून नेस्तनाबूत केल्याशिवाय राहात नसते. हा जगाच्या भूगोलावरील इतिहास आहे. मग तो हुकूमशहा जर्मनीचा हिटलर, मुसोलिनी असो किंवा इराकचा सद्दाम हुसेन असो किंवा लिबियाचा कर्नल गडाफी असो. जनता तिच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे कोणत्याही हुकूमशहा, तानाशाहाला माफ करत नाही. सिर्फ वक्त का तगाजा होना चाहिए। हे इथल्या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे.
(समाप्त)
- अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत