मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार सक्रिय; धूळ निवारण्यासाठी विशेष पथके.

मुंबईतील प्रदूषणाची समस्या गंभीर बनल्याने हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यांसंदर्भांत बैठक घेऊन मुंबई परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरूपात काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यासाठी एक हजार टँकर लावावेत. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. ‘एमएमआरडीए’ची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, अशा सूचना शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना केल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत