ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १११ व्या क्रमांकावर.

अलीकडेच प्रकाशित झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १११ व्या क्रमांकावर असून १२५ देशांमधील सर्वांत खालचा स्तरावर आहे व आपल्यापेक्षा अप्रगत म्हटले जाणारे शेजारील देश बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानच्याही मागे आहे.
Welt Hunger Hyfe (WHH) आणि Concern Worldwide या दोन नामांकित संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आहे, मागील निर्देशांकांप्रमाणेच भारत यावेळीही मूल्यांकनास आक्षेप घेईल हे लक्षात घेऊन दोन्ही संस्थांनी भारत सरकारशी बोलल्यानंतर आणि UN युनायटेड नेशन्स एजन्सीकडून उपलब्ध डेटाचा समावेश केल्यानंतर हा निर्देशांक जारी केला आहे. खरे तर हा निर्देशांक जागतिक व्यवस्थेसाठी वाईट बातमी सांगत आहे
जागतिक आणि राष्ट्रीय निर्देशांकांची गणना करण्यासाठी चार निर्देशक वापरले जातात कुपोषण अपुरे कॅलरी सेवन, स्टेटिंग वयानुसार कमी उंची, कमी वजन, उंचीनुसार कमी वजन, बालमृत्यू – पाच वर्षांखालील मुलांचे मृत्यू.
वरील चार निर्देशक २०३० पर्यंत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याची आशा देत नाहीत. २०३० पर्यंत शून्य उपासमारीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, ५८ राष्ट्रे, जे या अहवालाच्या यादीतील जवळपास निम्मे देश आहेत, किमान भूकपातळी गाठू शकणार नाहीत, शून्य उपासमारीचे उद्दिष्टे ही खूप दूरची गोष्ट आहे. *भाजप २०१९ मध्ये भारतातील १०० शहरं स्मार्ट सिटी करणार होते. सध्या लोकांचे खायचे वांदे झालेत.भाजपला गरीबांशी काय देणंघेणं नाही हेच यावरून स्पष्ट होतं
परंतु हे अंधभक्तांना सांगुन काय उपयोग?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत