
आज पुन्हा एकदा भारतीय संघ 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये मैदानात उतरला आहे. यावेळी टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे.
रोहित शर्मा आणि कंपनीच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जिंकून त्यांना उपांत्य फेरीचे तिकीट बुक करायचे आहे. या स्पर्धेत या दोन संघांनी आतापर्यंत सहा सामने खेळले. टीम इंडियाने आपले सर्व सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने केवळ 2 विजय नोंदवले आहेत.
विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहलीने 50 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. भारताची धावसंख्या 16.4 षटकात एका विकेटवर 104 धावा. शुभमन गिलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. गिलने 55 चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले, ज्यात आठ चौकारांचा समावेश होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत