आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरूच आहे. आज ११व्या दिवशी देखील भारताने १२ पदके पटकावत जगाला दाखवून दिले की, आम्ही देखील तुम्हाला टक्कर देऊ शकतो. अनस मुहम्मद याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने बुधवारी हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई खेळ २०२३मध्ये पुरुषांच्या ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. तर महिलांच्या विथ्या रामराज, ऐश्वर्या, कैलाश मिशांच्या संघाने पदक जिंकले. प्राची आणि सुभा वेंकटेशन यांनी ४×४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले.
पुरुषांच्या स्पर्धेत, भारताने हीट १ मध्ये ३:०३.८१ मिनिटांची जलद वेळ नोंदवून, कतार, जपान आणि इराकला मागे टाकून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. बेल्जियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियन्समध्ये जेकब, अनस, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल वरियाथोडी या चौघांनी मिळवलेल्या इव्हेंटमध्येही भारताच्या नावावर विशेष विक्रम आहे. संघाने २:५९.०५ मिनिटे पूर्ण केली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि त्या स्पर्धेत अंतिम फेरीत चॅम्पियन यूएसए बाजी मारत भारताला मागे टाकले होते. त्याची कसर आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भरून काढली.
भारतीय महिलांचा ४×४०० मीटर रिले संघ २००२ पासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत आहे. तथापि, भारतीय महिलांचा ४×४०० मीटर रिले संघ १९८२च्या दिल्ली एशियाडपासून या स्पर्धेत पदके जिंकत आहे. भारतीय रिले संघाचा भाग असलेल्या विथ्या रामराजने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी मंगळवारी ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत