फक्त आरक्षणामुळे समाज पुढे जात नसतो.

आरक्षण हे फक्त साधन आहे. किंवा एक संधी आहे. आरक्षण मिळाले की झाला विकास असे नाही. मराठा किंवा तत्सम उच्च समाज समूहांना वाटते की आज आंबेडकरी समाज सुधारलेला आहे तो केवळ आरक्षणामुळेच! हे स्पशेल चुकीचे आहे. आंबेडकरी समाजाने नवा विचार स्वीकारला म्हणून तो समाज पुढे गेला आहे. आरक्षण तर ही साधी गोष्ट आहे. एस सी गटातील इतर समाज घटकांना आरक्षण नाही का? आदिवासींना आरक्षण नाही का? हे समज मग बरे सुधारले नाहीत? आज तुम्हाला पुढे जायचे असेल तर नवे वैज्ञानिक व पुरोगामी विचार स्वीकारावे लागतील. नवा विचार डोक्यात भरून घ्यावे लागेल. मराठा पोरं हे करतील का? गणपती आणि दुर्गा उत्सवात सर्वात जास्त मराठा-ओबीसी असतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी जे आंबेडकरी समाजाचे आंदोलन झाले त्याला कडवा विरोध कुणी केला ? 200 च्या वर आंबेडकरी कार्यकर्त्यांची हत्या कुणी केली? या प्रश्नाचे उत्तर मराठा आणि ओबीसींना द्यावे लागतील आरक्षणाने समाज पुढे जात नसतो, विचारधारा बदलल्याने समाज पुढे जात असतो, मानसिकता बदलल्याने समाज पुढे जात असतो. मराठा किंवा ओबीसी हे बदल करू शकतील का? जर ते नवी पुरोगामी विचारधारा स्वीकारू शकत नसतील तर आरक्षण देऊनही त्यांचा विकास होणार नाही हे सत्य आहे. ।
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत