आर्थिकमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

गटार सफाईवेळी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ३० लाखांची भरपाई – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश.

लोकसभेत जुलै २०२२मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्लीमध्ये गेल्या पाच वर्षांत गटारे आणि सेप्टिक टाक्या साफ करताना ३४७ कामगारांचा मृत्यू झाला. गटारे साफ करताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना ३० लाख रुपये, तर कायमचे अपंगत्व आलेल्यांना किमान २० लाख रुपये भरपाई द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संबंधित सरकारी संस्थांना दिले.

गटारांमध्ये गुदमरून होणाऱ्या कामगारांच्या मृत्यूंची गंभीर दखल न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने घेतली आणि वरील आदेश दिले. त्याचबरोबर कामगारांमार्फत मैला वाहून नेणे- साफ करणे हा प्रकार पूर्णपणे बंद करण्याची खात्री केंद्र आणि राज्य सरकारांनी करावी, असेही खंडपीठाने नमूद केले. तसेच गटारांची सफाई करताना कामगार जखमी झाल्यास संबंधित सरकारी संस्थांना १० लाख रुपयांपर्यंत भरपाई द्यावी लागेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!