माणसा तू माणूस कधी होणार आहे?

जगाच्या पाठीवर भारतासारखी समाजव्यवस्था कोठेही नाही जगात माणसाची विभागणी त्या देशातील सर्वसाधारण जो धर्म असेल त्या धर्मातील दोन-चार जे काही पंथअसतील त्यामध्ये झालेली असते. तिथे खालचा वरचा हा प्रश्न येत नाही थोडक्यात खालचा वरचा हा कुठलाही भेदभाव नाही. परंतु जगाच्या पाठीवर भारत हा एकच असा देश आहे की त्यामध्ये माणसांची विभागणी 6000 जाती त्यामधील उपजाती शेकडोपंत वरचा खालचा यामध्ये झालेली असल्यामुळे माणूस बंधू भावापासून दूर फेकला गेला आहे. अशा प्रकारे हे समाजव्यवस्था 6 000 मजले असलेला एक असा मनोरा आहे की ज्याला सीडीच नसल्यामुळे एका मजल्यावरच्या माणसाला दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही. त्यानं तिथेच जन्म घ्यायचा आणि तिथेच मरायचं एक मात्र खरं होतं की 85% लोकांनी वरच्या उरलेल्या लोकांची सेवा करायची त्यांचा जन्म त्याच्यासाठीच झाला आहे शिवाय ही व्यवस्था देवाने त्याच्या धर्मानेच निर्माण केलेली असल्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण देव धर्म माणसापेक्षा मोठा होता.
वैज्ञानिक, इतिहास संशोधनावरून जगाने हे मान्य केलं आहे की माणसाच्या दैनंदिन सुखासाठी व्यवहारासाठी नैसर्गिक स्व परिस्थितीच्या गरजेनुसार त्या त्यावेळी माणसांन देव देवता, मानवी आचार विचारांची निर्मिती केली. पुढे त्याचेच धर्मात रूपांतर झाले व माणसाने माणसाशी कसे वागावे काय करावे, देव देवतांची पूजा कशी करावी? यासाठी दिशादर्शक ठरले. त्यालाच आपण धर्म म्हणू लागलो किंवा तो धर्म झाला व पुढे पुढे त्याचे विविध पंथात रूपांतर झाले परंतु लहान मोठा अशी वर्गवारी जगात कोठेच झाली नव्हती व आजही नाही
मग भारतातच दोन अडीच हजार वर्षापासून असं का घडलं? परमेश्वर जर विश्व निर्माता आहे असं मानलं तर त्यांनआपल्याच लेकरांमध्ये भारतामध्येच भेदभाव का निर्माण केला? त्यांच्या वाट्याला पशुतुल्य जीवन का घातल? या प्रश्नाचं उत्तर काल्पनिक नाहीतर वास्तवाला धरून इथल्या माणसांन दिल पाहिजे. कारण देवधर्म हे मानवनिर्मित आहेत हे जगणं मान्य केल आहे आणि त्याचे निर्माते हे जग जाहीर आहेत मग भारतातच ही परिस्थिती कोणी आणि का निर्माण केली हा प्रश्न आपल्या मेंदूला का पडत नाही? पण तो पडणार नाही कारण देवाचं नाव घेतलं की सारे प्रश्नच मरून जातात . पूर्वीचे लोक म्हणायचे व मान्य ही करायचे पृथ्वी हे शेषनागाच्या फण्यावर उभी आहे पुढे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं ती शेषनागाच्या नाही तर श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे आता विचारलं तर कुणीही सांगेल ती मोबाईलच्या सहा इंची स्क्रीनवर उभी आहे हे बदल माणूस स्वीकारतो मान्य करतो मग देव धर्म हे मानवनिर्मित आहेत जे जगानं मान्य केला आहे? त्याचप्रमाणे माणसाने जातीव्यवस्था का निर्माण केली? हे प्रश्न इथल्या माणसांना का पडत नाहीत? माझ्या मते याचा उत्तर एकच आहे ते म्हणजे त्याची अभिलाषा शोषण श्रेष्ठत्व या वृत्तीचा तो एक अविष्कार आहे आणि तो त्याला आपल्या जिवापाड जपतो आहे. याच्यापेक्षा दुसरं चांगलं उत्तर शोधूनही मला सापडत नाही थोडक्यात स्वतःची विकृती लबाडी हवस त्यानं देवाच्या नावे खपवली हे या देशाचा फार मोठ दुर्दैव आहे असाच मला वाटतं
स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्री सूत्राचा मानवी जीवनात संगम होऊन सर्व मानव जात एक आहे हे सूत्र भारतासह जगानं स्वीकारलअसताना भारतात मात्र माणसा माणसात लहान मोठा हे गारुड अजूनही लोकांच्या मनात रक्ताच्या अनु रेणूत इतकं काही भिनल आहे की खालच्या वर्गाच्या लोकांवर अन्याय अत्याचार करण्याचा अधिकार आपल्याला धर्माने दिला आहे असाच तो समजतो त्यातच वरच्या वर्गातील लोकांकडं आर्थिक, राजकीय सत्ता मत्ता असल्यामुळे तेही या भावनेला आज बळ देत आहेत. अगदी पोलीस स्टेशन पासून तर न्याय प्रशासन राजकीय यंत्रणेपर्यंत उघड उघड याचा प्रत्यय नेहमीच येत असतो परिणामी देशात एस सी, एसटी, एन टी.., इत्यादी स्त्री पुरुषांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे सत्ता मत्ता उच्च वर्गाचे लेबल असलेले हे लोक खून बलात्कार करून ही नाही राजरोसपणे मोकळे फिरत आहेत आणि फिर्यादीलाच तुरुंगात टाकलं जात आहे
आज जिथे देशाचा कायदा केला जातो त्या लोकसभेत कायदे करण्यासाठी अडीचशेच्या वर गंभीर गुन्हे दाखल झालेले लोक बसले आहेत त्यात दीडशे च्या वर बलात्कार खुनाचे गुन्हे दाखल झालेले असे आहेत. देशाचं राजकारण करण्याऐवजी सत्ताधारी जाती धर्माचा राजकारण करत आहे आणि त्यामधून एक नवा आक्रमक वर्ग तयार होत आहे. उदाहरण दाखल मध्य प्रदेशात च देता येईल खरंतर मध्य प्रदेश हा गाईंचा प्रदेश मानला जातो कारण उत्तर प्रदेशानंतर सर्वात जास्त गाई मध्य प्रदेशात आहेत आणि त्याच सरकारने कायदा करून सर्वात प्रथम गाईला राष्ट्रमाता हा दर्जा दिला. रस्त्यावरून चालताना हा कळप जर रस्त्यावर बसलेला असेल त्यांना हकलण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर सरकारने मानधनावर नेमलेले गोरक्षक त्याला मारायला सुद्धा कमी करणार नाहीत अशी परिस्थिती. इतका गाईला तेथे पूज्य मानल जात
परंतु त्याचवेळी व्यवस्थेने ज्यांना खालचा वर्ग म्हणून मान्यता दिली आहे त्या लोकांवर अन्याय अत्याचार होऊनही शिक्षा तर सोडाच साधी चर्चाही कोठे होत नाही त्याची फारशी दखल घेतली जात नाही.शेवटी अतिशय निराश होऊन त्यांचा तो अधिकारच आहे असाच म्हणण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही मध्यप्रदेशात गेल्या पंधरा दिवसापूर्वी एका आदिवासी मुलाला खाली बसून त्याला तोंड उघडत ठेवायला लावून एका उच्च वर्णीय माणसाने त्याच्या तोंडात लघवी केली आणि या संपूर्ण क्रियेची व्हिडिओ शूटिंग स्वतःच करून ती मीडियामध्ये प्रसारित केली. प्रश्न हा आहे त्याला इतकं मुजोर बिनधास्त उन्मत्त होण्याचं बळ कुठून आला? पेपरला छोट्याशा बातमी शिवाय त्याची वाचता कुठे झाली नाही पुढे त्या माणसाचं काय झालं कोणालाच माहीत नाही मीडियाही तोंडावर बोट ठेवून गप्प बसला. एक मात्र झालं खालच्या वर्गाचा आक्रोश वाढल्यामुळे व निवडणुकांचं आभाळ डोक्यावर भरून आल्यामुळे त्या माणसावर कारवाई करण्याऐवजी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण त्या मुलाच्या घरी गेले त्या मुलाचे पाय धुवून पाप लांचन करून प्रश्न निकाली काढला भोळ्या भाबड्या आदिवासींना वाटलं एवढा मोठा राज्याचा मुख्यमंत्री पाय धुतो? एक फार मोठी गोष्ट त्यांच्यासाठी होती ते त्या मुलाच्या तोंडात केलेली लघवी विसरून जातात आणि आता असं पुन्हा घडणार नाही स्वप्न पाहतात पुढच्या पाच-दहा दिवसातच मानवतेला लग्न करणारी एक घटना घडली
एका आदिवासी बारा वर्षाच्या मुलीला रस्त्यावर एका झाडाखाली नग्न करून एका नराधमान तिच्यावर अतिशय अमानुष बलात्कार केला तिला त्याच अवस्थेत टाकून तो निघून गेला. ती त्या रक्तबंबळ अवस्थेत तसेच रस्त्याने पळत सुटते आपला रक्तबंबाळ झालेलं शरीर लोकांना दाखवत मदतीची याचना करते मदतीसाठी अनेक घरांचे दरवाजे वाजवते परंतु एकही दरवाजा उघडत नाही का मदतीला पुढे कोणी येत नाही ती अशीच पुढे पळत राहते तिच्या नग्न रक्त बंबाळ शरीराच वेदनांच रस्त्यावरील कॅमेऱ्याने चित्र तयार केला असेल शेवटी पोलीस तिला हॉस्पिटलला भरती करतात भरपूर रक्तस्राव गेल्यामुळे चार दिवस ती बेशुद्ध कोमात किंवा तशा अवस्थेत होती शुद्धीवर आले नव्हते त्यानंतर तिचं पुढे काय झालं याची बातमी कोणत्याही मीडियावर आलीच नाही पाच दिवसांनी तो मुलगा सापडला ही बातमी मध्ये कोपऱ्यात आली परंतु त्या मुलीचं काय झालं याची काहीही माहिती. मुलगा तोच आहे का दुसरा कोणी आहे हे ते शुद्धीवर आल्यानंतर कळणार होतं
मध्य प्रदेश क्राईम ब्रँच च्या 2021 22 च्या आकड्यानुसार मध्य प्रदेशात बलात्काराच्या सरासरी रोज 18 घटना घडत होत्या त्या सर्व महिला या खालच्या वर्गाच्या त्यामध्ये नऊ बलात्कार हे अल्पवयीन मुलींवर होत होते म्हणजे वर्षाला साडेसहा हजार बलात्कार त्यात अर्धे अल्पवयीन मुलींवर घडत होते असं म्हणायला काही हरकत नाही. या जाती धर्मांना आम्हाला कुठे नेऊन पोचवला आहे एक तर कुठल्याही स्त्रीवर बलात्कार होऊ नये कारण धर्म सांगतो आणि काल-परवा लोकसभेत मंत्री महोदयांनी सांगितलं की स्त्रियांमध्ये सरस्वती लक्ष्मी दुर्गा या हिंदू धर्मातील तीन देवी वास करत असतात मग या मागासवर्ग यांच्या अल्पवयीन मुली महिला या स्त्रिया नाहीत का? नसतील तर कोण आहेत याचा उत्तर व्यवस्थेने द्यायला पाहिजे
गेल्या पाच सात वर्षांपूर्वी दिल्लीत एका उच्चवर्णीय मुलीवर पाच सात गुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिला खाली फेकून दिले. तिला वाचवणार हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच होतं त्यासाठी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून तर दिल्ली गेट पर्यंत प्रत्येक खेड्यातून शहरातून कॅण्डल मोर्चे निघाले शासनाने उपचाराची पराकाष्टा अगदी परदेशात सुद्धा नेलं परंतु ती वाचली नाही त्यानंतर अभया नावे 1000 कोटी रुपये फंड देऊन स्त्रियांच्या आरक्षणासाठी एक संस्था काढली असं बोललं जातं या सर्व प्रयत्नांबद्दल शासनाचा कौतुक केलं पाहिजे परंतु अशीच तत्परता दरवर्षी खालच्या वर्गांच्या महिला मुलींवर होणारे अत्याचार बलात्कार त्यानंतर कितीतरी मारूनही टाकल्या जातात अशावेळी? शासन आणि समाज तत्परता का दाखवत नाही? हा इथल्या समाज व्यवस्थेचा खरा कळीचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट इथं शेकड्याने बळी जात आहेत त्याचा हिशोब राज्य चालवणारे राज्यकर्ते कॅण्डल मोर्चा काढणारा समाज का ठेवत नाही हा ही प्रश्न मनात उभा राहिल्याशिवाय रहात नाही तेव्हा आम्ही कुठल्या धर्मात देशात राहत आहोत हा प्रश्न आमच्या आम्हालाच पडतो
राजकारणी इथला धार्मिक समाज गाईची जशी काळजी घेतो तशी त्यांनी बाईची पण घेतली पाहिजे नाहीतर गाईची काळजी काळजी घेणारा आणि बाईवर अन्याय करणारा समाज ते निर्माण करत आहेत हे त्यांनी वेळेवरच ओळखलं पाहिजे त्याचप्रमाणे खालच्या समाजाची बाई ही माणूसच आहे जनावर नाही हेही सत्ताधाऱ्यांना आणि धर्मांध झालेल्यांना तुम्ही आम्ही सांगितलं पाहिजे.जपानमध्ये नुकताच नवा कायदा करीत झाला मिनी कर्टवर जर एखाद्या महिलेचा कोणी फोटो घेतला तर तो बलात्कार समजला जाईल आणि शिक्षेस पात्र ठरेल त्याचप्रमाणे इंडोनेशियातही कायदा होऊन बलात्काऱ्याला नपुसक करण्याची शिक्षा मान्य झाली आहे. भारतात हे होणार नाही कारण तिला संसदेतच आधी सांगितल्याप्रमाणे दीडशे प्रतिनिधींवर बलात्कार खुणांचे गंभीर आरोप आहेत म्हणून हे सार जर बदलायचा असेल तर माणसानेच स्वतःच आत्मपरीक्षण करून आपल्यातल्या माणसाचा शोध घेतला पाहिजे माणूस झालं पाहिजे तेव्हा तेव्हा त्याला प्रत्येक स्त्रीमध्ये भारत माता दिसेल नाहीतर भारत माता की जय वंदे मातरम म्हणत आपणच आपल्याला देशाला फसवत आहोत देशाला वेगळ्या दिशेने नेत आहोत हे आपणच लक्षात ठेवलं पाहिजे
रा शी दोंदे..... नाशिक
Mo. 9637637972
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत