महाराष्ट्रसामाजिक / सांस्कृतिक

समाजसेवक, लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला, अहमदनगर पोलिसांत गुन्हा दाखल.

समाजसेवक, लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यावर प्राणघातक हल्ला केला. यासंबधीची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. यावरून पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेरंब कुलकर्णी हे एक लेखक आहेत. ते वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. ते वात्रटिकाही करतात. हेरंब कुलकर्णी हे इ.स. 2006 च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात देखील होते. दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. या लढ्याला अभ्यासातून धोरणात्मक पाया देण्याचे काम ते करत आहेत.

हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरच त्यांचा पाठलाग केला. त्या व्यक्तींनी गाडीसमोर आडवी गाडी लावत हेरंब कुलकर्णी यांची गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती आमच्याजवळ आले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली असल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.

मराठी साहित्य विश्वातील व्यक्तींवर हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील अनेकदा साहित्य क्षेत्रातील व्यक्तींवर हल्ले झाले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर नेमका हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, याचा अद्याप तपास सुरू आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!