14 ऑक्टोबरला कामधंदा सोडून अंतरवलीला या, जरांगे पाटील यांची हाक.

दि. 9/ऑक्टोम्बर
जरांगे पाटील यांनी 14 ऑक्टोबर रोजी सर्व कामधंदा सोडून जालन्यातील अंतरवली सराटीला येण्याची हाक मराठा समाजाला दिली आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. या सरकारला आम्ही 1 महिन्याच्या ऐवजी 40 दिवस दिले आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं
मनोज जरांगे पाटील यांनी काल सिन्नरमध्ये जनतेशी संवाद साधल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या सरकारला दिलेली मुदत 14 ऑक्टोबरला संपत आहे. तर आम्ही सरकारला दिलेला वेळ 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला सर्वांनी काम सोडून अंतरवलीला यायचे आहे. शांततेत याचे आणि शांततेत घरी जायचे आहे. माय माऊलींनी सुखरूप घरी जायचे आहे. तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करा. पण समाजाला डाग लागू द्यायचा नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सिन्नरमध्ये सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत