प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात 15000 घरांचे वितरण…

ते आज सोलापुरात विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केल्यानंतर बोलत होते. देशातल्या गरीबांना सशक्त करण्याची सरकारची नीती असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यामुळेच आम्ही मध्यस्थांना दूर करुन विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. देशात आतापर्यंत गरीबीमुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या. सरकारी योजनांचे गरीबांचे पैसे मध्यस्थांनी गडप केले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी राज्यातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या ९० हजार घरांचं, तसंच सोलापुरातल्या कुंभारी परिसरातल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेच्या १५ हजार घरांचं वितरण केलं. यातल्या काही लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते चावी देण्यात आली. पीएम स्वनिधी योजनेच्या १० हजार लाभार्थ्यांना कर्जाचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरीत करण्याची सुरुवात प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. त्यातल्या काही लाभार्थ्यांना त्यांनी धनादेश वितरीत केले. राज्यात अमृत योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या १ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा आणि मलःनिस्सारण प्रकल्पांचे भूमीपूजनही मोदी यांनी केले. भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, शेगाव, सातारा, सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती इथं हे प्रकल्प आहेत.रे नगर ही देशातली सर्वात मोठी श्रमिक कॉलनी असून प्रधानमंत्र्यांनी भूूमीपूजन केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन, त्यांच्याच हस्ते त्यांचं लोकार्पण होत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.रे नगर प्रकल्पाअंतर्गत एकूण साडे तीनशे एकर परिसरात ८३४ इमारती आणि ३० हजार फ्लॅट्स बांधण्याचं नियोजन आहे. गरीब आणि कामगारांच्या मदतीसाठी विविध मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते.
या वर्षअखेर पर्यंत ही ३० हजार घरं बांधून पूर्ण होतील, असा विश्वास आमदार नरसय्या आडाम यांनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत