आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान

अच्छे दिन कधी येणार? महागाईबाबत RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले..

चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर, रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याची घोषणा केली.

RBI ने रेपो दरात कोणताही बदल केला नाही ही FD योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण त्यांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदराचा लाभ मिळत राहील.
दुसरीकडे, महागाईबाबत शक्तीकांत दास यांनी माहिती देताना सांगितले की, FY24 महागाई दर 5.4% असा अंदाज आहे. यासोबतच, ते म्हणाले की ते महागाई कमी करणे हे RBI चे लक्ष आहे.

RBI गव्हर्नर म्हणाले की, जुलैमध्ये टोमॅटो आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ दिसून आली. याशिवाय जागतिक धोरणांचा महागाई दरावर परिणाम झाला. खरीप पिकांच्या अनिश्चिततेमुळे महागाईचा फटका बसला आहे.
शक्तीकांता दास म्हणाले की, आर्थिक वर्ष 24 (FY24) मध्ये महागाई दर 5.4% असण्याचा अंदाज आहे. मात्र, डाळींची लागवड कमी झाल्याने भाववाढीचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी काळात महागाई कमी होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जुलै आणि ऑगस्टमधील महागाईबाबत दास म्हणाले की, पुरवठ्यातील दबावामुळे जुलै-ऑगस्टमध्ये महागाई वाढल्याचे दिसून आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!