महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हनिमून संपायच्या आतच नाराजी सुरु-सुप्रिया सुळे.

महाराष्ट्राच्या राजकारणात जून महिन्यात (२०२३) मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार हे पक्षातील काही आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून दोन्ही गटाचे नेते सातत्याने आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं. “राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे”, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यापाठोपाठ ट्रिपल इंजिन सरकारमधील अजित पवारांचा गट नाराज असून देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून अजित पवार गटाला आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमधला एक गट नाराज आहे. यांच्या सरकारला तीनच महिने झालेत. यांचा अजून हनीमूनही संपला नाही आणि यांच्या नाराजीच्या बातमी येऊ लागल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!